चेहऱ्यावर मुरुमे आणि पुरळ आल्यामुळे सौंदर्यावर परिणाम होतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की हे मुरुमे का होतात? त्यामागे विशिष्ट कारणं असतात. ही कारणं ओळखल्यावर तुम्ही योग्य उपाययोजना करू शकता आणि मुरुमांना आळा घालू शकता. चला, मुरुमांच्या मुख्य कारणांबद्दल थोडक्यात पण सविस्तर माहिती घेऊया.
ताण आणि झोपेचा अभाव
जे लोक सतत तणावात राहतात, त्यांच्यावर मुरुमांचे प्रमाण अधिक असते. मानसिक तणाव त्वचेवर थेट परिणाम करतो. मुरुमांपासून दूर राहायचे असेल, तर तणाव नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्यासोबतच, पुरेशी झोप न मिळाल्यास देखील त्वचेची अवस्था बिघडू शकते. म्हणून, मुरुमांपासून मुक्त राहण्यासाठी शांत मन आणि चांगली झोप ही आवश्यक आहे.
रासायनिक उत्पादने
सौंदर्य वाढवण्याच्या नादात अनेक जण विचार न करता रासायनिक उत्पादने वापरतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. विशेषतः त्वचेच्या प्रकाराशी सुसंगत नसलेली उत्पादने वापरल्यास मुरुमांचा त्रास सुरू होतो. म्हणूनच, त्वचेची निगा घेताना योग्य उत्पादने आणि सौम्य घटक असलेले पर्याय निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा त्वचेचे बिघाड होऊ शकतात.
हार्मोनल असंतुलन
मासिक पाळी, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे मुरुमांचा त्रास सुरू होऊ शकतो. हे बदल त्वचेची छिद्रं बंद करतात, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि मुरुमांची शक्यता वाढते. हार्मोनल असंतुलन हे महिलांमधील मुरुमांचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना याचा विचार गरजेचा आहे.
अस्वस्थ खाण्याच्या सवयी
तळलेले, तेलकट आणि अस्वास्थ्यकर अन्न खाल्ल्यामुळे त्वचेवर मुरुमांचा त्रास जाणवू शकतो. तसेच, गोड पदार्थांचे अधिक सेवन मुरुमे वाढवू शकते, म्हणून गोड खाणं मर्यादित ठेवा. याशिवाय, शरीरात काही आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्यासही त्वचेवर पुरळ आणि मुरुमांची समस्या होऊ शकते. त्यामुळे संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.