प्रत्येक कुटूंबातील महत्वाचं नातं म्हणजे नवरा आणि बायको. हे नातं अखं कुटूंब तयार करत असतं. मात्र यांच्यात जर वाद निर्माण झाले तर संपूर्ण कुटूंबाची घडी मोडल्यासारखं होतं. त्यातील वादाचा गंभीर मुद्दा म्हणजे संशय. पुढे आपण जर नवरा बायकोच्या नात्यात सतत संशयावर भांडण होत असेल तर काय केले पाहिजे? याची संपूर्ण माहिती देणार आहोत.
नवरा-बायकोमध्ये सतत शुल्लक कारणांवरुन भांडणं होत असतात आणि ती नंतर काही न करता मिटतात. जर भांडणाचे मुळ कारण हे संशय असेल तर त्या नात्यातला विश्वास संपतो. शेवटी ते नाहीही संपते. त्यामुळे पुढे काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. ज्याचा विचार करुन तुम्ही तुमच्या नात्यातला संशय दूर करुन घट्ट नातं तयार करु शकता.
नवरा बायकोमधील संवाद
समजा बायको नवऱ्याशी कमी बोलतेय आणि इतरांशी तुलनेनं जास्त बोलतेय तर वाद होतो. त्यामुळे अशा वेळेस नवऱ्याने बायकोशी स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. जर या शंका मनात तशाच ठेवल्या तर याचे रुपांतर संशयात होते. म्हणूनच नवरा बायकोने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.
दुसऱ्या मुलासोबत बोलणे
पुरुषांना सगळ्यात जास्त राग तेव्हाच येतो, जेव्हा त्यांची बायको दुसऱ्या पुरुषाचे कौतूक करते. इतर मुलांशी जास्त संवाद सादते आणि नवऱ्याशी बोलताना चिडचिड करते. अशा वेळेस पुरुषांनी बायकोशी बोलून त्यांचा गैरसमज नात्यातील अंतर समजावून सांगितले पाहिजे. त्याने नात्यातला संशय दूर होतो.
विनाकारण संशय घेण्याची सवय
कधी कधी महिलां किंवा पुरुषांमध्ये विनाकारण संशय घेण्याची एक सवय लागते. ही अत्यंत चुकीची आणि नात्यात तडा निर्माण होणारी समस्या आहे. त्यामुळे एकदा का खात्री पडली तर त्यावर सतत संशय घेण्याची गरज नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.