Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : नवऱ्यासोबत तुमचं नातं किती मजबूत आहे ? कळेल या 5 कारणांवरुन...

How Strong is your Marriage Relation: लग्नासारखं नातं टिकवायचं असेल तर या बंधनात दोघांनीही समान मेहनत घेणे अधिक गरजेचे असते.

कोमल दामुद्रे

Couple Tips : पती-पत्नीचं नातं हे जगातलं सगळ्यात सुंदर नातं आहे. हे नातं जपताना प्रत्येकालाच काळजी घ्यावी लागते. लग्नानंतर दोघांनाही एकमेकांचा जोडीदार समजले जाते. परंतु, आयुष्याच्या काही टप्प्यांवर या नात्याला परिक्षा देखील द्यावी लागते. अशा स्थितीत हे ऋणानुबंध दृढ होणे अत्यंत गरजेचे आहे. जर असे झाले नाही तर नातेसंबंधात असूनही व्यक्तीला एकटेपणा जाणवू लागतो.

लग्नासारखं नातं (Relation) टिकवायचं असेल तर या बंधनात दोघांनीही समान मेहनत घेणे अधिक गरजेचे असते. या आधारावर नाते मजबूत आणि कमकुवत होते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला त्या 5 गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे नातं किती घट्ट आहे हे कळेल.

1. एकमेकांवर विश्वास ठेवा

विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. तो नसेल तर कोणतेचं नातं अधिक काळ टिकू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही नातेसंबंधात असाल, मग ते लग्न असो किंवा प्रेमप्रकरण, एकमेकांवर विश्वास असेल तर तुमचे नाते घट्ट होते.

2. संवाद

बोलल्याशिवाय एकमेकांबद्दल जाणून घेणे शक्य नाही. जोडीदार (Partner) कोणत्या तणावातून जात आहे हे समजणे देखील कठीण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळेवर साथ देऊ शकत नाही आणि गैरसमजामुळे नाते तुटण्याच्या मार्गावर येते. जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलू शकत असाल तर तुमचे नाते खूप मजबूत आहे.

3. निर्णय घेणे

जर तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य कोणासोबत घालवायचे ठरवले असेल तर कोणताही निर्णय तुमचा एकट्याने घेऊ नये. कारण यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात अविश्वास किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयात तुमच्या जोडीदाराला सामावून घेतो तेव्हा तुमचे नाते मजबूत होते.

4. एकमेकांच्या चुका समजून घेणे आणि क्षमा करणे

प्रत्येक व्यक्ती चुका करतो. कोणीही परिपूर्ण नसतो आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या जोडीदाराकडून अशी अपेक्षा करू नये. एकमेकांच्या चुका ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात हे मजबूत नातेसंबंधाचे लक्षण आहे. त्यालाही माफ करा.

5. सतत भांडण नको

लग्नानंतर (marriage) एकत्र राहत असताना अशा अनेक वेळा येतात, पती-पत्नीमध्ये मतभेद होतात. असे होणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि आवश्यकही आहे. यामुळे नात्यात प्रेम टिकून राहते.भांडणात एकमेकांना अपमानित करणे आणि दीर्घकाळ खेचणे तुमचे नाते खराब करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT