Eating Instant Noodles
Health News Saam TV
लाईफस्टाईल

Health News : तुम्हीही सतत Instant नुडल्स खाता? वयाच्या पंचवीशीमध्ये दिसाल ३५ वयाचे, वाचा दुष्परिणाम

Ruchika Jadhav

रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक व्यक्तींना जेवण बनवण्यासाठी वेळ नसतो. जास्त भूक लागल्यानंतर काही जण त्या वेळात झटपट इंस्टंट नुडल्स बनवतात. महाविद्यालयीन शिक्षणासाठी किंवा अन्य काही कामांसाठी तरुण मुलं मुली घरापासून दूर दुसऱ्या शहरात राहतात. त्यामुळे ते अशा पद्धतीने इंस्टंट मॅगी नेहमीच खातात. याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो.

ब्लड प्रेशर

इंस्टंट नुडल्स बनवताना त्या नुडल्समध्ये आधीच जास्तीचं मीठ मिक्स असतं. जास्त प्रमाणातील मीठ आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याने शरिरातील सोडीअम जास्त प्रमाणात वाढतं. त्यामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. तसेच हाय ब्लड प्रेशरच्या समस्या वाढतात.

अन्न पचत नाही

इंस्टंट नुडल्स गहू ऐवजी मैद्यापासून बनवले जातात. मैदा पचायला जड असतो. असे नुडल्स खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं, गॅसच्या समस्या वाढतात आणि अन्न निट पचत नाही.

अशक्तपणा

ज्या व्यक्ती सतत असे पदार्थ खातात त्यांच्या शरीरात जास्त व्हिटॅमीन नसते. सतत नुडल्स खाल्ल्याने प्रोटीन, मिनरल या कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. प्रोटीन आणि फायबर नसल्याने आपल्याला काही दिवसांनी अशक्तपणा जाणवू लागतो.

तुम्हालाही होतील हे आजार

आपण सुदृढ आणि निरोगी असण्यासाठी पोटभर जेवण केलं पाहिजे. त्यासाठी आधी सर्व पालेभाज्या, दूध, अंडी खाल्ली पाहिजेत. मात्र अनेकांना हे पदार्थ खाण्यासाठी जास्त वेळ नसतो.त्यामुळे ते फक्त इंस्टंट नुडल्सच खातात, त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. विविध रोग जडतात.डोके दुखी, दृष्टी कमी होणे, स्मृती जाणे, शरीराची हाडे कमजोर होणे अशा अनेक समस्या होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज या राशींच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा; नशिबाची मिळणार उत्तम साथ, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya : शनिदेवाच्या कृपेने 'या' राशींचे नशीब हिऱ्यासारखं चमकणार

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT