Ganpati Visarjan 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Ganpati Visarjan : गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात? त्यामागची कथा जाणून घ्या

Ganpati Visarjan : राज्यात आज गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ganpati Visarjan 2023

राज्यात आज गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात होत आहे. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर भरलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप दिला जात आहे. बाप्पाच्या विसर्जन करण्यामागे एक कथा आहे. ही कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१४ विद्या आणि ६४ कलांचा दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाची सर्वजण पूजा करतात. गणेशोत्सवाच्या काळात १० दिवस बाप्पा भाविकांच्या घरी विराजमान होतो. बाप्पाच्या आगमनाची जशी कथा आहे तशीच बाप्पाच्या विसर्जनाचीही एक कथा आहे.

गणपती विसर्जनाची कथा

महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रथांची रचना करण्यास सुरुवात केली. यामध्ये महाभारताचा मजकूर लिहिण्यासाठी त्यांनी गणपतीला सांगितले. त्यानंतर महाभारताच्या लिखाणाचे काम सुरू झाले. महर्षी व्यासांच्या सांगण्यावरुन गणपतीने १० दिवस रात्रंदिवस हे काम केलं.

ही कथा सांगून झाल्यावर जेव्हा महर्षी व्यास यांनी डोळे उघडले तेव्हा गणपतीच्या शरीराचं तापमान खूप वाढले होते. त्यानंतर गणपतीचे तापमान कमी करण्यासाठी महर्षी व्यास यांनी एका तलावात त्याला अंघोळ घातली. तेव्हापासून गणपती बाप्पाचे विसर्जनाची प्रथा सुरू झाली.

गणपती बाप्पाने महाभारताचे लिखाण करण्याची सुरुवात भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी केली होती. अनंत चतुर्थीच्या दिवशी हे काम संपले तेव्हापासून दहा दिवस हा सण साजरा केला जातो.

दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत आज बाप्पाचे विसर्जन होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जैन मुनीच पेटवतायेत मराठी-मारवाडी वाद? ताराराणींबद्दलच्या वक्तव्याचे राज्यातही पडसाद

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, अनेक ठिकाणी गारपीठ

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

SCROLL FOR NEXT