side effects of social media, social media addiction, digital detox ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

सोशल मिडियाचा अतिवापर, ठरु शकतो आरोग्याला घातक !

सोशल मिडियाचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : सध्या सोशल मिडिया हा आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. सध्या सोशल मिडियावर लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण सोशल मिडियावर अतिशय सक्रिय असतो.

हे देखील पहा -

सोशल मिडियाचे (Social media) एडिक्शन हे सध्या अतिशय तीव्र प्रमाणात वाढत जात आहे. त्यातील काही लोकांनी सोशल मिडिया शिवाय जगणे देखील मुशकिल झाले आहे. सोशल मिडियावर एखादी पोस्ट केल्यानंतर त्याला किती लाईक्स मिळाले, किती कंमेट आल्या हे आपण वारंवार तपासत राहतो. सतत त्याचा वापर केल्यामुळे आपल्याला त्याची सवय जडते व तो आपल्या कामात व आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पाडतो. याचा अधिक वापर करणाऱ्या लोकांमध्ये चिंता, नैराश्य व एकटेपनाची भावना वाढू लागते.

ज्या व्यक्ती स्वत:ला सतत सोशल मिडियाच्या अधिन करतात त्याचे आरोग्य अधिक खराब होत जाते. यामुळे त्याच्या शारीरिक व मानसिक समस्येवर परिणाम होतो. आपल्याला नैराश्य, चिंता किंवा एकटेपणा सतत वाटत असेल तर आपण सोशल मिडियापासून काही वेळेसाठी ब्रेक घ्यायला हवा. यामुळे आपल्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. तसेच नैराश्याचे प्रमाणही कमी होईल आणि झोप देखील आपली पूर्ण होईल. याचा फायदा आपल्या संपूर्ण शरीरावर व मनावर सकारात्मक पध्दतीने होतो. सोशल मिडियापासून स्वत:ला लांब ठेवण्यासाठी आपण डिजिटल डिटॉक्सचा वापर करु शकतो. सोशल मिडियाच्या वापराचे प्रमाण कमी करा. तो वेळ आपल्या कुंटुबाला किंवा प्रियजनाना द्या. स्वत:ला सतत कामात व्यस्त ठेवा त्यामुळे आपल्या आरोग्यावर (Health) त्याचा चांगला प्रभाव पडेल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT