Remedy for Wednesday saam tv
लाईफस्टाईल

Budhwar che Upay: बुधवारच्या दिवशी करा फक्त 'ही' 6 कामं; नशीब चमकून घरात होणार पैशांचा पाऊस

Remedy for Wednesday: हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे महत्त्व आहे. बुधवार हा दिवस विशेषतः गणपती बाप्पा आणि बुध ग्रहाला समर्पित आहे. गणपती हे विघ्नहर्ता असून ते बुद्धीचे आणि विद्येचे देवता आहेत, तर बुध ग्रह धन, व्यापार आणि बुद्धीचा कारक मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

  • बुधवार हा गणेशजींचा प्रिय दिवस आहे.

  • गणपतीचा गुळाच्या रसाने अभिषेक करावा.

  • शमी आणि पानाची पाने गणेशाला अर्पण करावीत.

हिंदू धर्मातील मान्यतांनुसार बुधवारचा दिवस भगवान गणेशांना अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. असं मानलं जातं की, गणेशपूजेने बुधदेव प्रसन्न होतात आणि कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती अनुकूल झाल्यास त्यांच्या कृपेने व्यापारात इच्छित यश मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उत्पन्न आणि सौभाग्य वाढतं.

ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी काही खास उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्यास नशीब उजळू शकतं आणि पैशांची तंगी दूर होऊ शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती साधायची असल्यास बुधवारच्या दिवशी हे उपाय अवश्य करावेत.

बुधदेवांना प्रसन्न करण्यासाठी काय करावं?

जर तुम्ही पैशांच्या तंगीने त्रस्त असाल आणि यापासून कायमचा दिलासा तुम्हाला हवा असेल तर तर बुधवारच्या दिवशी भगवान गणेशांची पूजा करून गुळाच्या रसाने गणपती बाप्पाचा अभिषेक करा. असं मानलं जातं की, या उपायाने गणेश बाप्पा लवकर प्रसन्न होतात.

विशेष पत्रांची अर्पण

भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी बुधवारच्या दिवशी पूजेदरम्यान त्यांना शमीची पानं आणि पानाचे पान अर्पण करा. हे पान अर्पण करताना-

"वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥"

हा मंत्र जपा.

वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय

घरातील वास्तुदोषापासून मुक्त व्हायचं असल्यास बुधवारच्या दिवशी स्नान करून भगवान श्रीकृष्णांना बासरी अर्पण करा आणि नंतर ती बासरी घरातील उत्तर दिशेला ठेवून द्या. या उपायाने घरातील वास्तुदोष कमी होतो.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी

जर तुम्हाला आर्थिक अडचणीतून सुटका हवी असेल, तर बुधवारच्या दिवशी भक्तिभावाने गणेश बाप्पाची पूजा करा. पूजेदरम्यान त्यांना दूर्वा आणि मोदक अर्पण करणं विसरू नका. या उपायाने पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात.

व्यापारात प्रगतीसाठी

जर तुम्हाला व्यवसायात वाढ आणि नफा हवा असेल तर बुधवारच्या दिवशी गणेश बाप्पाच्या पूजेत ११ किंवा २१ दूर्वा अर्पण करा. दूर्वा अर्पण करताना गणेश स्तुती करा. या उपायाने व्यापारात यश मिळते.

सौभाग्य वाढवण्यासाठी उपाय

जर तुम्हाला बुधदेवांची विशेष कृपा हवी असेल तर बुधवारच्या दिवशी पूजेदरम्यान गायीच्या कच्च्या दुधात दूर्वा मिसळून गणेश बाप्पाचा अभिषेक करा. या उपायाने सुख-समृद्धी आणि सौभाग्य वाढते.

बुधवारच्या दिवशी कोणाची पूजा करावी?

बुधवारच्या दिवशी भगवान गणेशांची विशेष पूजा करावी. यामुळे बुधदेव प्रसन्न होतात आणि कुंडलीतील बुध ग्रह अनुकूल होतो.

गणेशाचा अभिषेक कशाने करावा?

बुधवारच्या दिवशी गुळाच्या रसाने किंवा गायीच्या कच्च्या दुधात मिसळलेल्या दूर्वेने गणेशाचा अभिषेक करावा.

वास्तुदोष दूर करण्यासाठी काय करावे?

बुधवारी स्नान करून भगवान श्रीकृष्णांना बासरी अर्पण करावी आणि ती घराच्या उत्तर दिशेला ठेवावी.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी कोणते उपाय फायदेशीर?

गणेशाला दूर्वा आणि मोदक अर्पण करून भक्तिभावाने पूजा करावी. यामुळे पैशांच्या समस्या कमी होतात.

व्यापारात यश मिळविण्यासाठी काय करावे?

बुधवारी गणेश पूजेत ११ किंवा २१ दूर्वा अर्पण कराव्यात आणि गणेश स्तुती करावी. यामुळे व्यापारात प्रगती होते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं

Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Heart Attack: धक्कादायक! भारतातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT