Datta Jayanti 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Datta Jayanti 2023 : दत्तात्रेय हा कोणचा अवतार आहे ? त्यांचा जन्म कसा झाला ? जाणून घ्या

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Datta Jayanti 2022 : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... भगवान दत्तात्रेयांना त्रिमूतीचा अवतार मानले जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती उत्सव साजरा (celebrate) केला जातो. यंदा हा दिवस 26 डिसेंबर, मंगळवारी आहे.

भगवान दत्तात्रेय यांची महाराष्ट्रात (Maharashtra) विशेष पूजा केली जाते. हिंदू धर्मात त्यांच्या विविध कथा सांगितल्या जातात. हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त हे ब्रम्हा, विष्णू व महेश यांचा अवतार मानले जातात. दत्त हे औदुंबराच्या वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर किंवा अग्नीसमोर बसलेली आपल्याला दिसते.

गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा त्यांच्या मागचा परिसर दिसून येतो, स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.

त्यांची अनेक प्रसिद्ध मंदिरेही देशात आहेत. भगवान दत्तात्रेयाबद्दल असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा कोणी भक्त त्यांचे खऱ्या अंत:करणाने स्मरण करतो तेव्हा ते लगेचच त्यांना मदत करण्यासाठी अदृश्य स्वरूपात प्रकट होतात. त्यांच्या जन्माची कहाणीही खूप रंजक आहे. पुढे जाणून घ्या भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कहाणी...

असा झाला भगवान दत्तात्रेयांचा जन्म

  • पौराणिक कथेनुसार, एकदा देवी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांना त्यांच्या भक्तीचा अभिमान वाटला. त्रिदेवांना हे कळताच त्यांनी देवींचा अभिमान नष्ट करण्यासाठी लीला निर्माण केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी नारदजी भटकत असताना देवलोकात गेले आणि तिन्ही देवींच्या समोर अत्रि मुनींची पत्नी अनुसूया हिच्या भक्तीची स्तुती करू लागले.

  • तिन्ही देवींनी आपापल्या पती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना हे सांगितले आणि त्यांना अनुसूया देवीच्या भक्तीची परीक्षा घेण्यास सांगितले. पत्नींच्या सांगण्यावरून त्रिदेव साधूच्या रूपात अत्रि मुनींच्या आश्रमात आले. महर्षी अत्री त्यावेळी आश्रमात नव्हते. त्रिदेवांनी भिक्षूच्या वेषात अनुसुईया देवीकडे भिक्षा मागितली, परंतु तुम्ही आम्हाला नग्न अवस्थेत भिक्षा द्यावी लागेल अशी अट ठेवली.

  • हे ऐकून अनुसुईया देवीला धक्का बसला, पण तिला वाटले की साधू रागावणार नाहीत. असा विचार करून तिला आपल्या पतीचे स्मरण झाले आणि म्हणाली, जर माझा पतीत् धर्म खरा असेल तर या तिन्ही ऋषींनी सहा महिन्यांचे बाळ व्हावे. लगेच तिन्ही देव बाळासारखे रडू लागले. मग अनुसूया आई झाली, त्याला आपल्या मांडीत घेतले, दूध पाजले आणि पाळणा घालू लागली.

  • हे तिन्ही देवींना कळताच त्यांनी येऊन अनुसूया देवीची क्षमा मागितली. त्यानंतर देवी अनुसुईयाने त्रिदेवाला पूर्वरूपात परत आणले. प्रसन्न होऊन त्रिदेवांनी त्याला वरदान दिले की आम्ही तिघेही तुझ्या पोटी पुत्ररूपात जन्म घेऊ. वरदान म्हणून ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र, शंकराच्या अंशातून दुर्वास आणि विष्णूच्या अंशातून दत्तात्रेय उत्पन्न झाले.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT