Teenage love Saam Tv
लाईफस्टाईल

Teenage love : पौगंडावस्थेत तुमच्या मुलांना प्रेम झालंय? पालकांनी 'या' चुका करु नका, अन्यथा...

प्रेमात पडलेली मुलं-मुली डोक्याने विचार करण्यापेक्षा हळवे होऊन मनाने किंवा हृदयाने निर्णय घेतात.

कोमल दामुद्रे

Teenage love : पौगंडावस्थेत मुलांचे वय झाल्यानंतर आई-वडीलांना फार काळजी वाटू लागते. या वयात मुलांना स्वत:चे निर्णय घेण्याची इच्छा अधिक बळकट होत असते.

तसेच या दरम्यान मुला-मुलींचे प्रेम हा आई-बाबांसाठी फार काळजीचा विषय आहे. मुलगा आणि मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यावर, हे काय वय आहे प्रेम करायचे ? या वाक्याने सुरूवात होते. अर्थातच ते चिडतात आणि मुलांवर बंधने लादतात. त्याला पुन्हा भेटायचे नाही, त्याचे नाव पुन्हा घ्यायचे नाही अशा धमक्या पालक देऊ लागतात. आपली मुलगी किंवा मुलगा चूकीच्या माणसाच्या प्रेमात तर नाही ना याची काळजी (Care) त्यांना वाटत असते.

जगात अशी कितीतरी जोडपी आहेत जी कॉलेजमध्ये (Collage) असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि हा प्रेमाचा प्रवास लग्न करुन पूर्णत्वास नेतात. एकमेकांसोबतचा हा प्रवास नक्कीच त्यांच्यासाठी संस्मरणीय असतो, पण मित्रमैत्रीणींनो प्रत्येक वेळीच लहान वयात झालेलं प्रेम त्याच्या ध्येयापर्यंत पोहचताना सहजासहजी मार्ग काढेल असं नाही.

प्रेमात पडलेली मुलं-मुली डोक्याने विचार करण्यापेक्षा हळवे होऊन मनाने किंवा हृदयाने निर्णय घेतात. ज्यामुळे अशा काही गोष्टी घडतात की, त्याचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर करावा लागतो. हल्लीची बरीच मुलं-मुली कॉलेजमधील आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रीणीच्या प्रेमात पडतात. येथून सुरु झालेली प्रेमकहाणी ही अनेक साहसांनी भरलेली आणि भावनिक बंधात बांधली गेलेली असते. त्यामुळे अशा परिस्थितीत बरेचजण अभ्यासापेक्षा प्रेमाला आणि नात्याला जास्त महत्व देऊ लागतात. यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि त्याचा परिणाम रिझल्टवर देखील पडू शकतो. त्यामुळे करियर डोळ्यांपुढे ठेवून जास्तीत जास्त मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा. कारण जे नातं मुळत: मजबूत आहे ते कधीच तुटणार नाही.

Child Stage

प्रेम भंग झाल्यावर -

साहजिकच मूडी, हिंसक, संवेदनशील, भावनिक, बेफिकीर आणि परिणामांची चिंता न करता झटपट निर्णय घेणारी, कोणती कारवाई करणे हे कळणेही अवघड असते. भावनेच्या भरात ते कोणताही चुकीचा निर्णय घेऊ शकतात. कधी कधी प्रेमात फसवणूक झाल्यावर किंवा हृदय तुटल्यावर ते हे सर्व सहन करू शकत नाहीत. तुमच्या मुलाने-मुलीने तुटून पडण्यापूर्वी आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी किंवा शांतता गमावण्यापूर्वी त्याची काळजी घ्या.

हा त्यांच्या वयाचा टर्निंग पॉइंट आहे. अशा परिस्थितीत, पालकांनी आपल्या व्यस्त आयुष्यातून बाहेर पडून त्यांच्याकडे संयमाने लक्ष दिले पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे आणि त्यांना समजून घेतले पाहिजे.

आपल्या प्रयत्नाने मुलांना योग्य मार्गावर मार्गदर्शन करू शकतो आणि त्यांच्यात सकारात्मक विचार विकसित करू शकतो, कारण शैक्षणिक यश आणि परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्याव्यतिरिक्त, जीवन व्यवस्थापन कौशल्यांचे पर्याय शाळेत शिकवले जात नाहीत. आज आपल्याला त्यांच्या भावना आणि संवेदना समजून घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG T20 WC Semi Final: टीम इंडियाचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार

मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI लढाऊ विमान गायब, शोध सुरू

Friday Horoscope : ताणतणाव दूर होईल; ५ राशींच्या लोकांना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

दादांच्या आमदारांनाही घातपाताचा संशय? आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

SCROLL FOR NEXT