Chanakya Niti Success Mantra Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti : नीतीशास्त्रातील या 4 श्लोकांचे आचरण करून राहाल इतरांपेक्षा नेहमी चार पावलं पुढे, वाचा सविस्तर

Chanakya Niti On Success Mantra : चाणक्यांची धोरण हे यश मिळविण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते. या कलयुगात यश मिळवणे सोपे नाही, परंतु चाणक्यांच्या या 4 गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही कधीही शर्यत जिंकण्यापासून राहणार नाही.

Shraddha Thik

Success Mantra :

चाणक्यांचे धोरण हे यश मिळविण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते. या कलयुगात यश मिळवणे सोपे नाही, परंतु चाणक्यांच्या या 4 गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही कधीही शर्यत जिंकण्यापासून राहणार नाही.

आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. चाणक्यांनी मानव कल्याणाचे आपले विचार श्लोकांच्या माध्यमातून मांडले आहेत. चाणक्यांचे धोरण हे यश (Success) मिळविण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते.

नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् ।

छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः ॥

आचार्य चाणक्य सांगतात की, माणसाचा जास्त सरळपणा त्याच्या गळ्यातला काटाही बनू शकतो. उदाहरणार्थ, चाणक्य म्हणतात की, जंगलात प्रथम सरळ झाडे तोडली जातात कारण वाकड्या झाडांच्या तुलनेत सरळ झाडे तोडण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. यामुळेच प्रत्येकजण माणसाच्या सरळपणाचा फायदा (Benefits) घेतात, म्हणूनच या कलयुगात यश मिळवायचे असेल तर थोडी हुशारी आवश्यक आहे.

कः कालः कानि मित्राणि को देशः कौ व्ययागमौ ।

कश्चाहं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुहुः ॥

जर तुम्हाला तुमचे भविष्य घडवायचे असेल, तर तुम्ही योग्य वेळ, योग्य मित्र, योग्य ठिकाण, पैसे कमवण्याचे योग्य साधन, पैसा (Money) खर्च करण्याचा योग्य मार्ग आणि तुमचा उर्जा स्त्रोत याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे तुम्हाला प्रत्येक मार्गावर यश मिळेल.

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।

ध्रुवाणि तस्य नश्यन्ति चाध्रुवं नष्टमेव हि ॥

चाणक्यांनी या श्लोकात म्हटले आहे की, ज्याला सर्व काही मिळवण्याचा लोभ असतो तो योग्य गोष्टीही सोडून देतो. जो माणूस ठराविक म्हणजे योग्य गोष्टींचा त्याग करतो आणि अनिश्चित म्हणजे चुकीचा मार्ग पत्कारतो, त्याचा अधिकारही नष्ट होतो. म्हणून, जेव्हाही तुम्ही कोणताही निर्णय घ्याल तेव्हा बरोबर आणि चुकीचे मोजमाप करा.

गुणैरुत्तमतां याति नोच्चैरासनसंस्थितः।

प्रासादशिखरस्थोऽपि काकः किं गरुडायते॥

चाणक्य म्हणतात की, मनुष्याला त्याच्या कर्तृत्वाने आणि गुणांमुळे श्रेष्ठ मानले जाते. त्यांनी सांगितले की शिकलेला माणूस गरीब असू शकतो पण श्रीमंतांमध्ये तोही आदरणीय असतो. पैसा, संपत्ती आणि पद याने माणूस महान होत नाही, जसे राजवाड्याच्या शिखरावर बसून कावळा गरुड होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Railway Accident : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या एक्सप्रेसमधून ३ जण पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

SCROLL FOR NEXT