Chanakya Niti On Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Success : स्त्री असो वा पुरुष, आयुष्यात यश मिळवण्यासाठी चाणक्यांच्या या गोष्टी अवलंबा

Successful Life : चाणक्यांनी नीतिशास्त्रात जवळजवळ प्रत्येक विषयाची सत्यता आणि खोली सांगितली आहे.

Shraddha Thik

Chanakya Niti :

चाणक्यांनी नीतिशास्त्रात जवळजवळ प्रत्येक विषयाची सत्यता आणि खोली सांगितली आहे. आचार्यांनी माणसाला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की अनेक वेळा व्यक्ती अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या संकटात सापडते, परंतु प्रत्येक गोष्टीचा वेळीच विचार करून पुढील मार्ग निवडणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अगोदरच सावध होणार नाही, तर पुढचा मार्गही स्पष्ट होईल. असे केल्याने अनेक प्रकारचे नुकसान टाळता येते. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला माहित असणे आवश्यक आहे-('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचार्य चाणक्य म्हणतात की, अनेक वेळा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून माणूस मोठ्या संकटा सापडतो, परंतु प्रत्येक गोष्टीचा वेळीच विचार करून पुढचा मार्ग निवडणे महत्त्वाचे असते. आचार्यांचे हे शब्द आजही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात लागू आहेत. जीवनात (Life) या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही अनेक समस्या टाळू शकता.

वेळेनुसार प्लान बदला

आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाला नेहमी काही प्रश्नांची उत्तरे माहित असणे आवश्यक आहे. आचार्य म्हणतात की स्त्री (Women) असो की पुरुष, सदैव सावध राहिले पाहिजे. सध्या काय चालले आहे आणि तुमच्या आजूबाजूला कोणत्या परिस्थिती घडत आहेत याची जाणीव ठेवा. आनंदी आणि दुःखाच्या दिवसांनुसार आपली रणनीती बनवा. तसंच त्यानुसार तुमची वागणूक आणि कामाची पद्धत बदला.

खरा मित्र ओळखला पाहिजे

आचार्य यांच्या मते, जीवनात खरा मित्र मिळणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु त्याहूनही महत्त्वाचे आहे की तुमचा खरा मित्र कोण आहे हे जाणून घेणे. तुम्ही ज्याला मित्र मानता तो तुमचा शत्रू नसतो. त्यामुळे तुमच्या मित्राला वेळीच ओळखण्याचा प्रयत्न करा. हेतू पहा, मित्रांची संख्या नाही.

तुमचे कामाचे ठिकाण आणि सहकारी जाणून घ्या

आचार्य यांच्या मते, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण जिथे काम करत आहोत तिथे वातावरण कसे आहे हे पाहणे गरजेचे आहे. तुमचे सहकारी कसे आहेत? या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहता. अशा परिस्थितीत यश मिळण्याची शक्यताही वाढते.

तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मागोवा ठेवा

उत्पन्नाच्या प्रमाणात कमी खर्च करणे हा सुखी जीवनाचा मंत्र आहे. आचार्य चाणक्य यांनीही याबाबत सांगितले आहे की, सुखी जीवनासाठी धनसंचय आवश्यक आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. पैसे वाचवा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा.

तुमची प्रतिभा ओळखा

आपण आपली ताकद आणि प्रतिभा ओळखणे सर्वांत महत्त्वाचे आहे. स्वतःवर आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. जे काम तुम्हाला करता येईल तेच हाती घ्या. पण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत राहा. ढिलाई करू नका आणि जे काम कराल ते मनापासून करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT