कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे पैलू- भाग १ Saam Tv
लाईफस्टाईल

कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे पैलू- भाग १

आपल्या कामात अर्थपूर्णता आणि उद्देश महत्त्वाचा आहे. आपल्यापेक्षा मोठे-उदात्त असा उद्देश व ध्येय असल्यास मन संकुचित राहत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कमी वेळात अचूक पद्धतीने काम करण्यावर भर देण्याला कार्यक्षम म्हटलं जातं. आपण दिवसातून किती तास काम करतो यापेक्षा त्या तासांत आपण कोणकोणती कामं केली, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच कॉर्पोरेट विश्वात कार्यक्षम नोकरवर्गाला जास्त महत्त्व आहे. कार्यक्षमता म्हणजे काय हे आपण या आधीच्या लेखात जाणून घेतलं. आता या लेखात कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे महत्त्वाचे पैलू कोणते ते पाहुयात..

१. उद्देश (Purpose)

आपल्या कामात अर्थपूर्णता आणि उद्देश महत्त्वाचा आहे. आपल्यापेक्षा मोठे-उदात्त असा उद्देश व ध्येय असल्यास मन संकुचित राहत नाही. उद्देशाला धरून काम केल्यास कार्य साफल्य आणि यशस्वीतेची भावना तितकी मोठी असेल. योग आपल्याला आपल्याच विचारांच्या डबक्यातून बाहेर काढतो. आपल्यातल्या ‘मी’च्या जाणिवेला वारंवार योगाभ्यासाने 'वैश्विक' जाणिवेशी स्वतःला जोडल्यास आपल्या मनाची, बुद्धीची, क्षमतेची उदात्तता व विशालता वाढते आणि आपणच आखून ठेवलेल्या कुंपणाच्या बाहेर जाण्याची भूक लागू लागते. ही अमर्यादता कामात येऊ लागली, की कार्यक्षमता वाढल्याशिवाय राहणार नाही.

२. एक तत्त्व अभ्यास (Focus)

आज अनेक उपकरणांमुळे आणि सतत कुठे काय चालू आहे याची माहिती असण्याची गरज भासत असल्याने मन सारखे बाहेर धावत असते. काही न काही कारणाने मन विचलित होण्याने एका जागी केंद्रित करणे अवघड होते. याला योगसूत्रात 'अलब्धभूमिकत्व' म्हटले आहे. अष्टांग योगातील ‘प्रत्याहार’ आणि ‘धारणा’ हा आपले लक्ष एका जागी केंद्रित ठेवण्यासाठीचा अभ्यास आहे. याच लेखाशी संबंधित कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे एकाग्रता आणि आरोग्य या पैलूंचे महत्त्व आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक|VIDEO

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान

सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, निकालानंतरही बंगलामध्ये हत्येचं सत्र सुरूच

SCROLL FOR NEXT