Chanakya Niti On Bad Time Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Bad Time: आयुष्यात संकट येण्यापूर्वी भाग्य देते हे 5 संकेत, चुकूनही करु नका दुर्लक्ष

Chanakya Niti for Bad Phase In Life: आलेले संकट हे काही दिवसांपूर्वी असले तरी ते मात्र थोड्या दिवसांसाठी असते.

कोमल दामुद्रे

Niti Shastra Chanakya: आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आपल्याला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागते. आलेले संकट हे काही दिवसांपूर्वी असले तरी ते मात्र थोड्या दिवसांसाठी असते.परंतु, हे आपल्या आयुष्यभराचा धडा शिकवते.

आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, जेव्हा आपल्यावर संकट येते तेव्हा आपल्या काही संकेच पूर्वीपासून मिळत असतात. अनेक वेळा (Time) आपल्याला आजूबाजूला काही अशा महत्त्वाच्या घटना घडतात की, आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. जाणून घेऊया त्याबद्दल

वाईट वेळ येण्याआधी सापडतात या 5 चिन्हे

1. तुळशीचे रोप सुकवणे

तुळशीचे (Tulsi) रोप हिंदू धर्मात खूप पूजनीय मानले जाते, ते घरात लावल्याने सुख-शांती येते. परंतु, जर तुमच्या अंगणातील तुळस सतत सुकत असेल तर लवकरच आर्थिक संकटाना सामोरे जावे लागेल असे चाणक्य सांगतात. त्यासाठी तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घ्यायला हवी.

2. घरातील मोठ्यांचा अनादर करणे

आपण आपल्या घरातील मोठ्यांचा नेहमी आदर केला पाहिजे, कारण वडील आपल्याला आशीर्वाद देतात. जर आपण त्यांचा आदर केला नाही तर ते दुःखी होतील आणि जे लोक वडिलांशी अशी वागणूक देतात त्यांना आयुष्यात कधीही आनंद मिळत नाही. त्यांना आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

3. धार्मिक कार्य न करणे

जर तुम्ही घरी नियमित पूजा करत नसाल किंवा तुम्हाला पूजा करावीशी वाटत नसेल. अशा स्थितीत तुमच्या घरात सुख-समृद्धीची कमतरता भासू शकते. चाणक्य म्हणतात की, हे संकेत आर्थिक संकट दर्शवते कारण जिथे पूजा नाही तिथे सुख आणि समृद्धी असू शकत नाही.

4.तुटलेली काच

जर तुमच्या घरातील काच किंवा काचेची भांडी वारंवार तुटत असतील तर हे गरिबी किंवा पैशांचे नुकसान दर्शविते. म्हणून आपल्याला वेळोवेळी सतर्क राहाणे गरजेचे आहे.

5. मतभेद

तुमच्या घरातही अचानक कलह वाढला आणि तुम्हाला त्याबद्दल काही समजत नसेल तर तुम्हाला आर्थिक समस्यांना लवकरच सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात जोरदार पावसाला सुरुवात, शेती कामांना येणार वेग

Jio Recharge Offer: जिओ ₹९४९ vs ₹९९९ Plan, जिओचे टॉप प्लॅन फायदे जाणून घ्या

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा इशारा

FASTag Pass: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! ३००० रुपयांचा पास अन् वर्षभर मोफत प्रवास, या अ‍ॅपवर करता येणार अर्ज

Rajgira Ladoo Recipe : श्रावणात उपवासाला खास बनवा राजगिऱ्याचे लाडू, वाचा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT