Aditya Dhar Upcoming Film Budget Trouble Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aditya Dhar Trouble: ‘उरी’ फेम आदित्य धर यांच्या अडचणीत आणखी वाढ; रिलीजपूर्वीच आगामी सिनेमाला ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

गेल्या अनेक वर्षापासून ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ हा चित्रपट बराच चर्चेचा मुद्दा ठरला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी चित्रपटाला राम राम ठोकल्यावर दिग्दर्शकांना चित्रपटाच्या बजेटबद्दल आणि निर्मात्यांबद्दल प्रश्न उद्भवला आहे.

Chetan Bodke

Aditya Dhar Upcoming Film Budget Trouble: सध्या बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य धर त्यांच्या ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या आगामी चित्रपटामुळे बरेच चर्चेत आहेत. ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’चे दिग्दर्शक चाहत्यांना गुड न्युज कमी पण वाईट बातम्याच सर्वाधिक देत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ हा चित्रपट बराच चर्चेचा मुद्दा ठरला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी चित्रपटाला राम राम ठोकल्यावर दिग्दर्शकांना चित्रपटाच्या बजेटबद्दल आणि निर्मात्यांबद्दल प्रश्न उद्भवला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात विकी कौशलने काम केले होते. त्यानंतर आदित्य धर यांच्यासोबत विकीचा हा दुसरा चित्रपट होता. विकीने त्याच्या आगामी चित्रपटासाठी जोमात तयारी देखील केली होती, पण काही कारणास्तव विकी कौशलने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याची बातमी समोर आली. (Bollywood Film)

त्यानंतर रणवीर सिंग देखील चित्रपटात झळकणार होता, पण त्याने ही चित्रपटातून काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली. मध्यंतरी या चित्रपटातून अभिनेत्री सारा अली खानलासुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशातच या चित्रपटाशी निगडीत आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. (Bollywood News)

‘पिंकव्हीला’ने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रदर्शनापूर्वी जवळपास ३० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करणार होते, नंतर काही कारणास्तव त्यांनी या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. त्यानंतर आदित्य धर चित्रपटासाठी निर्माता शोधत होता. नंतर जिओ स्टुडिओने याची निर्मिती करायचं ठरवलं, पण विकी कौशलला न घेता हा चित्रपट करावा असं त्यांचं मत होतं. (Bollywood Actor)

जिओने दिग्दर्शकांना स्पष्ट नकार दिल्यानंतर आदित्यने बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांना चित्रपटासाठी विचारलं, परंतू आता जिओने सुद्धा या चित्रपटाच्या निर्मितीला नकार दिल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रोजेक्टवर आदित्य धर आणि त्याची टीम काम करत आहे, यादरम्यान तब्बल ३० कोटी खर्च झाल्याचं स्पष्ट झालं आहे आणि आता निर्माता नसल्याने हे नुकसान वाढलं असल्याचं म्हंटलं जात आहे. सध्या तरी या चित्रपटाचं भविष्य अंधारात आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT