Sukh Mhanje Nakki Kay Asta Saam TV
मनोरंजन बातम्या

Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीप वाचवेल का गौरी आणि बाळाचे प्राण...पुढे काय घडणार?

देवी अंबाबाईला साकडं घालून जयदीप वाचवू शकेल का गौरी आणि बाळाचे प्राण.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sukh Mhanje Nakki Kay Asta Episode Update: नवरात्री या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक जण या सणात कसं सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात टीव्हीवरील मालिका कशा मागे राहतील. नुकतंच 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ची टीम कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन आली आहे. मालिकेतील एका महत्वाचा भाग शूट करण्यासाठी संपूर्ण टीम तिथे गेली होती.

मालिका एका महत्वाच्या वळणावर आली आहे. गौरी आणि जयदीप (Gauri Jaydeep) आई-बाबा होणार आहेत. त्यातच गौरीचा अपघात झाला आहे. गौरी आणि बाळाच्या जीवाला धोका आहे. ते दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. गौरीचे आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी जयदीप कोल्हापूरला अंबाबाईला (Ambabai) साकडं घालण्यासाठी गेला आहे.

जयदीप मंदिरामध्ये साफसफाई करताना, दिवे लावताना दिसत आहे. तसेच जयदीप मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या चपला सांभाळताना देखील दिसत आहे. हा भाग आपल्याला नवरात्री दरम्यान पाहता येणार आहे.

जयदीप हे पात्र साकारणारा अभिनेता माधवने या विशेष भागासाठी खूप मेहनत केली आहे. माधवने यापूर्वी देखील कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. परंतु त्याची इच्छा होती की मालिकेचा एकतरी भाग या पवित्र जागी चित्रित व्हावा. माधवने सांगितले की, "देवी अंबाबाईच्या आशीर्वादाने माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. शूटिंगच्या निमित्ताने मला इथे काम करण्याची संधी मिळाली हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. या विशेष भागचे शूटिंग पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांचे हे प्रेम मला नवी ऊर्जा देतं."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT