Lata Mangeshkar: लता मंगेशकर अन् किशोर कुमारांनी गायलेली प्रसिद्ध प्रेमगीतं, आजही करतायेत राज Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lata Mangeshkar: लता मंगेशकर अन् किशोर कुमारांनी गायलेली प्रसिद्ध प्रेमगीतं, आजही करतायेत राज

भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना आधी कोरोना आणि नंतर न्युमोनियाची लागण झाली होती. (Famous love songs sung Lata Mangeshkar Kishore Kumar)

हे देखील पहा-

नीले नीले अम्बर पर, चाँद जब आये, प्यार बरसाए, हमको तरसाये...लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी उत्तम गायलेली गाणी आहेत. ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम गाणी गायली आहेत. त्यापैकी खूप गाणी त्यांनी किशोर कुमारबरोबर गायली आहेत. या २ दिग्गज गायकांप्रमाणे गाण्याचे प्रत्येक तरुण गायकाचे स्वप्न असते. पण लताजींच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली होती. जेव्हा त्यांनी किशोर कुमारबरोबर गाणे टाळले होते. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी 'तुम आ गये हो नूर आ गया है', 'आप की नजरों ने समझा' याबरोबरच अनेक हिट गाणी एकत्र गायली आहेत.

आज देखील लोक त्यांची प्रसिद्ध गाणी गात आहेत आणि गुणगुणत असतात. पण, काही काळानंतर लताजींनी किशोर कुमारबरोबर गाणं रेकॉर्ड करण्यास नकार दिला होता. याचे कारण म्हणजे किशोर कुमार यांची विनोद करण्याची सवय, यामुळे लता मंगेशकर नाराज होते. जेव्हा गीतकार समीर 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचले होते तेव्हा त्यांनी हा मजेदार प्रसंग त्यांनी यावेळी सांगितला होता. गीतकार समीरने कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते की, किशोर कुमार यांच्या बरोबर संबंधित ही गोष्ट लताजींनीच त्यांना सांगितली होती.

ते म्हणत होते की, 'लताजी आणि आशाजींनी काही काळानंतर किशोर कुमारबरोबर गाणी गाण्यास नकार दिला होता. लताजींनी समीरला सांगितले की किशोर दा यायचे आणि आम्हा दोघींना विनोद सांगून खूप हसवत असत. यामुळे आम्हाला कंटाळा यायचा आणि ते स्वतः मात्र गाायचे. यानंतर लताजींनी किशोर कुमारबरोबर गाणे गाण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर दोघे परत गाण्यासाठी एकत्र आले. गीतकार समीरने 'द कपिल शर्मा शो'मध्ये पुढे सांगितले की, 'लता आणि किशोर यांना खूप दिवसांनी गाण्याकरिता एकत्र यावे लागले.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT