भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत. युजवेंद्र (yuzvendra chahal) आणि धनश्री यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. तर चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत. यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र आणि धनश्री अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे त्यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता मात्र धनश्री वर्माने तिला ट्रोल करणाऱ्यांना खडसावले आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिला आणि तिच्या घरच्यांना कोणत्या मनस्थितीतून जावे लागत आहे. याचा खुलासा तिने केला आहे.
धनश्रीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये असे आहे की, "तिला आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसात खूप त्रास झाला आहे. गेले काही दिवस त्यांचे खूप कठीण काळात गेले आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता अफवा पसरवणाऱ्या ट्रोल्सकडून तिला ट्रोल केले जाणे तिला खूप अस्वस्थ करत आहे. तिने आपले नाव आणि प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे मेहनत केली आहे." असे एकंदर धनश्रीला आपल्या स्टोरीतून बोलायचे आहे.
पुढे धनश्रीने त्या स्टोरीत लिहिलं आहे की, "माझे मौन माझी कमजोरी समजू नका. ती माझी ताकद आहे. मी माझ्या सत्य परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून पुढे जात आहे. " गेले अनेक दिवसांपासून युजवेंद्र आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चे सोशल मीडियावर सुरू आहे. त्यावरू अनेक लोक त्यांना ट्रोल करत आहे. आता यावर धनश्रीने वर्मा सडेतोड उत्तर दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.