Ghulam Successfully 25 Years Saam Tv
मनोरंजन बातम्या

25 Years of Ghulam: काय सांगता... आमिरनं ‘गुलाम’मधील 'या' सीन्ससाठी केली नव्हती १२ दिवस आंघोळ; झाले होते भयानक हाल

Chetan Bodke

Ghulam Successfully 25 Years: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अमिर खान अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहतो. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात कमाईच्या बाबतीत फ्लॉप झाल्यानंतर अमिर खान एकाही चित्रपटात दिसला नाही. त्याने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्याचे सांगितले होते. आमिर खानचा उत्तम अभिनय आपण सर्वांनीच थ्री इडियट्स, तारे जमिन पर, लगान, गुलाम सोबत अनेक चित्रपटात पाहिला आहे, आणि त्याचे हेच चित्रपट सर्वाधिक सुपरहिट चित्रपट ठरले होते. अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘गुलाम’ या चित्रपटाला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

आमिर आणि राणी प्रमुख भूमिकेत असलेला ‘गुलाम’ चित्रपट २० जून १९९८ला प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘आती क्या खंडाला’ या गाण्याने सर्वांनाच भूरळ घातली होती. आजही हे गाणं प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. या हिट चित्रपटाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही तुम्हाला चित्रपटासंबंधित एक रंजक माहिती सांगणार आहोत, कदाचित ती गोष्ट तुम्हाला माहित नसेल, चला तर जाणून घेऊया चित्रपटाबद्दल...

कलाकारांनी अभिनयासाठी जेवण सोडल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण ‘गुलाम’साठी आमिरनं थेट अंघोळच सोडून दिली होती, हो हे तुम्ही बरोबर ऐकलंत. खरं तर, एक सीनचं शूटिंग पूर्ण करण्यासाठी त्याने अंघोळ केली नव्हती.

‘गुलाम’ चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर २४ ते २५ कोटी इतकं कलेक्शन केलं होतं. या चित्रपटाच्या शेवटच्या भागात आमिर आणि एका खलनायकाचा एक मारामारी करतानाचा सीन होता. मारमारी केल्यानंतर चेहऱ्यावर असलेल्या खुणा या शेवटपर्यंत ठेवायच्या होत्या. चेहेऱ्यावर त्या मारलेल्या खुणा तशाच ठेवायच्या असल्याने आमिरने जवळपास १० ते १२ दिवस अंघोळ केली नाही.

चेहऱ्यावरील हावभाव आणि व्रण तसेच दिसायला हवे म्हणून अमिरने अंघोळ न करण्याचा निर्णय घेतला होता. अंघोळ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आमिरला फार काही त्रास झाला नव्हता. या विचित्र निर्णयामुळे आमिरचा शूटिंग दरम्यान गोंधळ उडाला होता. पण शेवटपर्यंत तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. तो शेवटचा क्लायमेक्स सीन पूर्ण झाल्यानंतरच त्याने अखेर अंघोळ केली होती.

आमिर खानची पुर्वाश्रमीची पत्नी किरण राव हिने एकदा ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने आमिरला अंघोळ करायला आवडत नाही, याचा खुलासा केला होता. यावेळी करण जोहरने किरणला अमिरबद्दल अनेक गोष्टी विचारल्या होत्या. त्यावेळी तिने त्याच्याबद्दल हा किस्सा सांगितला होता. अनेकदा जर प्रेक्षकांना सांगितले तर त्यांना हे खरं नाही असं वाटतं, पण त्याने चित्रपटाच्या त्या शूटिंगवेळी अंघोळ नव्हती केली, हे मात्र खरं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT