बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन झाले. २८ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायत्री यांच्या निधनाचे कारण जरीही अस्पष्ट असलं तरी, वयोमानानुसार त्यांचे निधन झाल्याचे बोलले जात आहे. राजकुमार यांच्या निधनानंतर गायत्री आपल्या तीन मुलांसोबत मुंबईमध्ये राहत होत्या. (Bollywood)
गायत्री यांच्यासोबत मुंबईमध्ये, पारू राज कुमार, पाणिनी राज कुमार आणि मुलगी वास्तविकता पंडित यांच्यासोबत राहत होत्या. गायत्री पंडित गेल्या २७ वर्षांपासून पतीशिवाय एकटीनेच सर्व संसाराचा गाडा हाकलला. गायत्री यांच्या निधनामुळे फक्त राजकुमार यांच्या फॅमिलीवर नाही तर अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीवरही शोककळा पसरली आहे. ३ जुलै १९९६ रोजी राजकुमार यांचे निधन झाले होते. राजकुमार यांचे निधन घशाच्या कर्करोगामुळे झाले होते. (Bollywood Film)
राजकुमार यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनयामध्ये काम करण्यापूर्वी राजकुमार यांनी इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केली होती. पण खाकी वर्दीतली नोकरी सोडून त्यांना अभिनयामध्ये पाऊल ठेवले. राजकुमार यांनी ‘तिरंगगा’, ‘सौदागर’, ‘हीर रांझा’, ‘पाकिझा’, ‘मदर इंडिया’, ‘वक्त’, ‘नील कमल’, ‘जवाब’, ‘लाल पत्थर’, ‘झिंदगी’, ‘काजल’, ‘राज तिलक’, ‘साजीश’, ‘घराणा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.