Bigg Boss 19: यावेळी, टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो, बिग बॉस १९ च्या वीकेंड का वार दरम्यान, एक अनपेक्षित घटना घडली. निर्मात्यांनी प्रणित मोरेवर एका स्पर्धकाला वाचवण्याचा निर्णय सोपवला. तो तीन स्पर्धकांपैकी कोणत्याही एका स्पर्धकाला वाचवू शकत होता. त्याने अशनूर कौरला वाचवले. यासह, अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांना शोमधून बाहेर काढण्यात आले.
प्रणित मोरेच्या धक्कादायक निर्णयामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. प्रणित मोरे असा निर्णय घेईल यावर कोणालाही विश्वास नव्हता. आता, अभिषेकचे चाहते प्रणितवर आपला राग काढत असून प्रणित मोरेने त्याच्या निर्णयामागील कारणही सांगितले.
प्रणित मोरे काय म्हणाला?
गौरव खन्नाने प्रणित मोरेला अशनूरला वाचवण्याचे कारण विचारले तेव्हा प्रणित म्हणाला, "मी फक्त मूल्याबद्दल विचार करत होतो." गौरव मग म्हणाला, "सलमान खानने तुला एक ओळ सांगितली, खेळासाठी कोणाची निवड करु नको जो योग्य असेल त्याला निवड, कारण निर्णय तुझ्या हातात होता. जर तू अभिषेक बजाजला थांबवले असते तर बर झालं असतं कारण तो निष्पक्ष होता. त्याने काहीही चूक केली नाही.
गौरवने प्रणितला विचारले, "ठीक आहे, तू मूल्यांबद्दल विचार केलास, मग अशनूरची मूल्ये अभिषेकपेक्षा चांगली होती का?" प्रणितने उत्तर दिले, "मला वाटते की ती गोष्टी समजते, लोकांबद्दल विचार करते. ती नेहमीच प्रत्येकासाठी उभी राहते. गौरव खन्नाने प्रणितला सांगितले की सलमान खानने अशनूर कौर ११ आठवड्यांपासून खेळात नसल्याचे सांगितले, यावर प्रणितने उत्तर दिले, "मी माझ्या मूल्यांना सोडू शकत नाही. जर मी खेळ खेळत असतो, तर मी एक बनावट नाते निर्माण केले असते." तसेच अभिषेक आणि नीलम गेल्यानंतर प्रणित मोरेला अश्रू अनावर झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.