Aai Kuthe Kay Karte 4th September Episode Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Update: केळकरांच्या घरी जाताच ईशाला झाला श्रीमंतीचा गर्व; अरुंधती कसं करेल लेकीचं गर्वहरण

Pooja Dange

Aai Kuthe Kay Karte Todays Episode:

'आई कुठे काय करते' ही मालिका महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक नेमीचं उत्सुक असतात. चला तर मी जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे ते?

'आई कुठे काय करते' मालिकेकच्या आजच्या भागाची सुरुवात देशमुखांच्या घरापासून होते. केदार देशमुखांच्या घरी जेवण बनवत असतो. कांचनला खूप भूक लागल्याने ती अस्वस्थ झालेली असते. दरम्यान यश येतो आणि मग त्यांची रक्षाबंधनावर चर्चा होते.

पुढे अनिरुद्ध आणि संजना येतात त्यांच्या नेहमीसारखे वाद होतात. इतक्यात अनघा आणि अभि येतात. अनघाच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याने ती महिरे गेलेली असते. अनघा, अनिरुद्धच्या म्हणते 'बाबा तुम्ही ईशाचं कन्यादान केलात मला खूप बार वाटलं.' यावर अनिरुद्ध तिला म्हणतो हे 'मी ईशासाठी नाहीतर स्वतःसाठी केला आहे आहे. नाहीतर आयुष्यभर मनाला टोचणी लागली असती.'

त्यानंतर अनिरुद्ध, अनघाला तिच्या बाबांची तब्येत कशी आहे असं विचारतो. तसेच तिला सांगतो 'त्यांना सांग कामाचं टेन्शन घेऊ नका.' तर अनघाला म्हणते, 'त्यांना कामाचं नाही तर माझं टेन्शन आहे.'

अनघा-अनिरुद्ध बोलत असताना केदार किचनमधून बाहेर येतो. अनिरुद्ध केदार तिथे सुनावतो. पण समजूतदारपण दाखवून केदार ते सर्व आरोप मान्य करतो. तसेच तो आणि अनिरुद्धच्या सारखेच आहेत असे सांगतो. गोड बोलून केदार, अनिरुद्धला चांगलंच सुनावतो आणि विशाखा आणि कांचन-अप्पांची माफी मागतो. (Latest Entertainment News)

केळकरांकडे सुलेखा ताई लग्नात ईशाचे लाड करता आले नाहीत म्हणून खंत व्यक्त करत असतात. तेवढ्यात दाराची बेल वाजते. ईशाचं पार्सल आलेलं असत. ईशाने अभि आणि यशासाठी २००० हजार रुपयांच्या राख्या ऑर्डर केलेल्या असतात.

अरुंधती, ईशाला कोणाला विचारून इतक्या महाग राख्या मागवल्या असे विचारते. अरुंधती ईशाला इतके पसे खर्च करण्यावरून बोलते. ईशाला अरुंधतीच राग येतो. ईशा, अनिशला राखीचे पैसे द्यायला सांगते. पण इथे प्रश्न पैश्याच नसून असलेला पैदास कसा खर्च करावा हे समजावून सांगण्यासाठी अरुंधती प्रयत्न करत असते. डिलिव्हरी बॉय दारात असल्यामुळे आशुतोष त्याला पैसे देतो.

अरुंधती आशुतोषला पैसे का दिले असे विचारतो. त्यावर आशुतोष तिला समजावून सांगतो. तर ईशाला वाटत अरुंधती चुकली आहे. परंतु आशुतोष तिचा हा समज दूर करतो. त्यानंतर सुलेखा ताई ईशाला पैशांचं महत्त्व समजावून सांगतात. त्यावर नितीन ईशाला म्हणतो के अरुंधतीला देखील हेच म्हणायचं होत. पण ईशाला अरुंधतीला तिला घालूपासून बोलायचं होत असं म्हणते आणि राख्यांचा बॉक्स फेकून देते.

ईशाकडून राखू बांधून घेण्यासाठी निखिल देशमुखांच्या घरी आलेला असतो. सगळेजण ईशाची वाट बघत असतात. संजना, निखिलला म्हणते फेऱ्या मारल्याने ईशा किंवा छकुली लवकर येणार आहेत का? त्यावर निखिल म्हणतो 'हो. कारण जेव्हा तू माझी वाट पाहत फेऱ्या मारत असायचीस तेव्हा मी यायचो लवकर. पण आता नाही येत. करम माझी वाट पाहणार कोणी नसतं ना.'

निखिलचं हे बोलणं ऐकून संजना खूप वाईट वाटत. ती निकीललाल सांगते की, एकात राहण्याची सवय लावून घेऊ नकोस.

निखिल-संजनाचं यांचं बोलणं ऐकून अप्पा म्हणतात, निखिल, संजना तिकडे नसते कारण ती इकडे तुझी वाढ बघत फेऱ्या मारत असते. आता तू इकडे ये म्हणजे तुमची चुकामुक होणार नाही. त्यावर निखिल अप्पांना म्हणतो 'मी पण इथे आलेले अनिरुद्ध अंकलला आवडत नाही'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारचं आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT