PM Kisan Samman Nidhi Scheme provides ₹6,000 annual financial support to eligible landholding farmers across India. saam tv
बिझनेस

PM KISAN Yojana: बटाईदार शेतकरीही पीएम किसान योजनेसाठी पात्र असतात? दुसऱ्याच्या शेतात काम करणाऱ्यांनाही ६ हजार रुपये मिळतात का?

PM-KISAN Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सर्वात महत्वाची आवश्यकता म्हणजे जमिनीची मालकी असते. सरकार महसूल नोंदींवरून लाभार्थींची ओळख पटवते. याचा अर्थ असा की ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे त्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

Bharat Jadhav

  • पीएम किसान योजनेचा लाभ फक्त जमिनीच्या मालक शेतकऱ्यांनाच मिळतो.

  • बटाईदार किंवा भाडेकरू शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.

  • दरवर्षी ६,००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.

देशातील लाखो कुटुंबांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांकडे शेती कमी आहे. तर काहीजण इतरांच्या जमिनीवर बटाईदार म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतात. वाढत्या महागाईत सरकारी योजना या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहेत. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. यातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत, दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात.

या योजनेतून आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आलेत आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. पण प्रश्न नेहमीच पडतो, तो म्हणजे दुसऱ्यांच्या शेती जमिनीत बटाईदार म्हणून काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा निधी मिळतो का? हे जाणून घेऊ.

या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे जमिनीची मालकीची आहे. सरकार महसूल नोंदींवरून लाभार्थींची ओळख पटवते. याचा अर्थ असा की, ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे त्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. या योजनेसाठी फक्त तेच पात्र मानले जातात.

जर एखादा शेतकरी बटाईदार असेल तर जमीन त्याच्या नावावर नसेल, तर सध्याच्या नियमांनुसार त्यांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नाही. जरी तो शेतीत कठोर परिश्रम करत असला तरी, जोपर्यंत जमिनीची मालकी त्याच्या नावावर नोंदणीकृत होत नाही, तोपर्यंत त्याला योजनेचा लाभ मिळत नाही.

बटाईदार म्हणजे काय?

ग्रामीण भागात मोठ्या संख्येने शेतकरी दुसऱ्यांच्या जमिनीवर पिके घेतात. त्या बदल्यात जमिनीच्या मालकाला उत्पादनाचा काही भाग देतात. त्यांना सामान्यतः बटाईदार म्हणून ओळखले जाते. ते शेती जरी करत असतील तरी जमिनीचे कागदपत्र त्यांच्या नावावर नाहीत. त्यांना योजनेचा थेट पात्र नाहीत. जर एखाद्या भागधारकाच्या नावावर जमिनीचा एक छोटासा तुकडा देखील नोंदणीकृत असेल, तर त्यांना त्यांच्या जमिनीच्या आधारे योजनेचा लाभ घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates : चिन्ह ठाकरेंचे वापरले, मंत्री शिंदेंचे झाले; मग पक्षावर ताबा कोणाचा?, सर्वोच्च न्यायालयात मोठा वाद

Cabinet Decisions : फडणवीस सरकारचे १० महत्वाचे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना काय मिळणार?

कोण आहे मॅडी जॉन्सन? जी दर महिन्याला केसांवर करते तब्बल २९,००० रुपयांचा खर्च; कारण वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: पुण्यातील वाहतूक कोंडी, हॉकर्स आणि वाढत्या अपघातांच्या प्रश्नावर महत्त्वाची बैठक

Kidney Health: किडनीच्या समस्यांनी त्रस्त आहात? सकाळी 'या' हिरव्या पानांचं पाणी प्या, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT