Government Scheme For Farmer Saam Tv
बिझनेस

Scheme For Farmer: सरकार शेतकऱ्यांना देतेय ३६००० रूपये, फक्त हे काम करा

PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ३६००० रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी राबवल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, याच उद्देशाने वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान मानधन योजना राबवली आहे.

पीएम किसान मानधन योजनेत (PM Kisan Mandhan Yojana) शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपये मिळतात. या योजनेत ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. शेतकऱ्यांना उतारवयात कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची पात्रता

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत १८ ते ४० वयोगटातील शेतकरी जोडले जाऊ शकतात. त्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसावी. याचसोबत ते करदाते नसावे. त्यांनी इतर सरकारी योजना म्हणजे पेन्शन, ईपीएफ, एनपीएस आणि ईएसआयसी या योजनेचा लाभ घेतला नसावा. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला ५५ ते २०० रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे.

या योजनेतील योगदान हे शेतकऱ्यांच्या वयावर अवलंबून असते. या योजनेत जर ४० व्या वर्षी कोणी गुंतवणूक करत असेल तर दर महिन्याला त्याला २०० रुपये द्यायचे आहेत. तेव्हा त्याला वयाच्या ६० वर्षानंतर ३००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. त्यासाठी सर्वात आधी www.pmkmy.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर Apply Now वर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरावी. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

SCROLL FOR NEXT