Mukhyamantri Annapurna Yojana Saam Tv
बिझनेस

Annapurna Yojana: फक्त ‘लाडकी बहीण’चं नव्हे तर सरकारची महिलांसाठी आणखी एक योजना, कोणाला लाभ मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Mukhyamantri Annapurna Yojana: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना वर्षाला ३ सिलिंडर मोफत मिळणार आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत कुटुंबियांना अन्नधान्यांचे मोफत वाटप केले जाते. त्याचसोबत नागरिकांना मोफत सिलेंडरदेखील मिळणार आहे. पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबियांना फायदा होणार आहे.

राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना आवश्यक वस्तू मोफत मिळाव्यात, या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे. राज्यातील दुर्बल घटकातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवण्यात आसी आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नागरिकांना स्वस्त दरात पौष्टिक अन्नपदार्थ दिले जातात. यामध्ये गहू, तांदूळ अशा जीवनावश्यक गोष्टी कमीत कमी दरात दिल्या जातात. तसेच ६५ वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत १० किलो धान्य देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होणार आहेत.

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता महिलांना ३ सिलिंडर मोफत मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर सिलिंडरची जोडणी असणे गरजेचे आहे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.१४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरची जोडणी असणारे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT