भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील लाखो शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळेच सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंप बसवण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यासाठी सबसिडी दिली जाते. या सबसिडीच्या रक्कमेतून शेतकरी पंप बसवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त फायदा होणार आहे.
सोलर पंप बसवल्यानंतर विजेची बचत होणार आहे. परिणामी वीज बील कमी येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे पीक घेण्यासाठी मदत होणार आहे. सब्सिडीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात सोलर पंप बसवून देणार आहे. ही योजना २०१९ रोजी सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत ३ वर्षात १ लाख सोलर पंप लागवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करता येणार आहे.
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे त्याची स्वतः ची जमीन असायला हवी. तसेच जमिनीत शेतीसाठी जल स्त्रोत असायला हवे. फक्त शेतकरी या योजनेत अर्ज करु शकतात.
कृषी सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीवर किंवा बोरवर पंप बसवण्यासाठी सबसिडी मिळणार आहे. यामुळे विहरीतील पाणी तुमच्या शेतात जाईल. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. वीजेची बचत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.