IAS Vijay Vardhan Saam Tv
बिझनेस

IAS Success Story: ३५ वेळा नापास, जिद्द सोडली नाही, IAS झालाच; विजय वर्धन यांची सक्सेस स्टोरी

Siddhi Hande

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी अपयश येते. परंतु कितीही मोठे अपयश आले तरीही त्यावर मात करुन जो व्यक्ती आपले काम करत असतो, त्यालाच आयुष्यात यश मिळते.असंच यश आयएएस ऑफिसर विजय वर्धन यांना मिळालं आहे. विजय वर्धन यांना वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांमध्ये तब्बल ३५ वेळा अपयश आले होते.तरीही पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली आणि यश मिळवलं. आत विजय वर्धन हे आयएएस ऑफिसर आहे.

हारकर ही जो जीत जाता है असे बाजीगर कहते है, असं म्हणतात. हे वाक्य विजय वर्धन यांना एकदम शोभून दिसते. हरियाणाच्या विजय वर्धन हे अपयशामुळे कधीच खचले नाही त्यांनी यूपीएससी परीक्षा देत चांगले यश मिळवले. (IAS Officer Vijay Vardhan Success Story)

आयएएस विजय वर्धन (IAS Vijay Vardhan) हे मूळचे हरियाणाचे रहिवासी आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर यूपीएससी परिक्षेची तयारी करण्यासाठी ते दिल्लीला गेले. त्यानंतर त्यांनी ३५ वेळा वेगवेगळ्या सरकारी परीक्षा दिल्या. परंतु त्यात त्यांना अपयश मिळाले. परंतु त्यांनी नेहमी प्रयत्न केले. त्यांनी २०१८ साली यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.

विजय वर्धन यांनी १०४ रँक मिळवली. परंतु तरीही ते नाखुश होते. त्यांना आयएएस ऑफिसर व्हायचे होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०२१ मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली आणि यश मिळवले. त्यानंतर ते आयएएस अधिकारी म्हणून कार्य करत आहेत.

विजय वर्धन यांना एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल ३५ वेळा अपयश आले. तरीही ते डगमगले नाही. याउलट त्यांनी आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा एकदा परीक्षा दिली. सुरुवातीला यूपीएससी परीक्षेत पास झाल्यानंतर त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०२१ मध्ये आयएएस होण्यासाठी परीक्षा दिली आणि ते यशस्वी झाले. (UPSC Aspirant Success Story)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Breaking : हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरलं

Benefits of taking Steam: वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सोडवला जाणार

Maharashtra Assembly Election : निवडणूक जाहीर होताच महायुतीला सर्वात मोठा धक्का! राज्यात जुन्या मित्रपक्षाने सोडली साथ; VIDEO

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीत मिठाचा खडा? अमित शहांच्या वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT