Gratuity Rule
Gratuity Rule Google
बिझनेस

Gratuity Rule: कर्मचाऱ्याने कंपनीत ५ वर्षे पूर्ण न केल्यासही मिळू शकते ग्रॅच्युइटी, जाणून घ्या नियम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी म्हणून मोठा निधी मिळतो. एखाद्या कर्मचाऱ्याने त्या कंपनीत किमान ५ वर्ष नोकरी पूर्ण केली पाहिजे. परंतु आता जर एखाद्या व्यक्तीने काही कारणात्सव नोकरीचा राजीनामा दिला तरीही त्याला ग्रॅच्युइटीचा निधी मिळतो. यासंबंधित काही नियम आहेत ते जाणून देऊयात.

ग्रॅच्युइटीसंबंधित तरतुदी ग्रॅच्युइटी कायदा १९७२ मध्ये समाविष्ट केल्या आहेत. या कायद्यानुसार जर एखाद्या कंपनीत कर्मचाऱ्याने ५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली तरी त्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्ष पूर्ण होण्याआधी राजीनामा दिला तर तो व्यक्ती ग्रॅच्युइटी कायद्यानुसार ग्रॅच्युइटीसाठी दावा करु शकतात.

ग्रॅच्युइटी ही तीन गोष्टींवर अवलंबून असते. ग्रॅच्युइटी कायद्यानुसार, कर्मचाऱ्याने किमान ५ वर्ष पूर्ण केलेली असावी. जर एखाद्या कंपनीमध्ये ५ दिवस काम करण्याचा नियम असेल तर तो कर्मचारी ४ वर्ष १९० दिवस काम पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटीचा दावा करु शकतात. जर कंपनीत ६ दिवस काम करण्याचा नियम असेल तर त्या कर्मचाऱ्याला कंपनीत ४ वर्ष २४० दिवस काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळेल.

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, वकील आदित्य चोप्रा यांनी ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 4 (2) चे काही मुख्य मुद्दे स्पष्ट केले आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत ४ वर्ष ६ महिने काम केले असेल तर तो कर्मचारी ग्रॅच्युइटी पेमेंटचा हक्कदार असेल. याशिवाय काही विशेष परिस्थितीमध्ये म्हणजे कर्मचाऱ्याचा मृत्यू, आजार किंवा अपघातामुळे अंपगत्व या परिस्थिती किमान वेळ पूर्ण करण्याची अट लागू होत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapsed : 'घाटकोपरचा तो अपघात नाही, तर...', होर्डिंग दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Today's Marathi News Live : ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

S Jaishankar: कोणाच्या तरी चुकीमुळे काश्मीरचा भाग गमावला; परराष्ट्रमंत्र्यांनी नेहरूंवर साधला निशाणा

Janhvi Kapoor : जान्हवीचं मनमोहक सौंदर्य; घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते क्लिन बोल्ड!

Health Tips: डायबिटीजच्या रुग्णांनी अशापद्धतीने खावा भात, नाही वाढणार शुगर लेव्हल

SCROLL FOR NEXT