Gratuity Rule Google
बिझनेस

Gratuity Rule: कर्मचाऱ्याने कंपनीत ५ वर्षे पूर्ण न केल्यासही मिळू शकते ग्रॅच्युइटी, जाणून घ्या नियम

Gratuity Rule For Employee: प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी म्हणून मोठा निधी मिळतो. एखाद्या कर्मचाऱ्याने त्या कंपनीत किमान ५ वर्ष नोकरी पूर्ण केली पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी म्हणून मोठा निधी मिळतो. एखाद्या कर्मचाऱ्याने त्या कंपनीत किमान ५ वर्ष नोकरी पूर्ण केली पाहिजे. परंतु आता जर एखाद्या व्यक्तीने काही कारणात्सव नोकरीचा राजीनामा दिला तरीही त्याला ग्रॅच्युइटीचा निधी मिळतो. यासंबंधित काही नियम आहेत ते जाणून देऊयात.

ग्रॅच्युइटीसंबंधित तरतुदी ग्रॅच्युइटी कायदा १९७२ मध्ये समाविष्ट केल्या आहेत. या कायद्यानुसार जर एखाद्या कंपनीत कर्मचाऱ्याने ५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली तरी त्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्ष पूर्ण होण्याआधी राजीनामा दिला तर तो व्यक्ती ग्रॅच्युइटी कायद्यानुसार ग्रॅच्युइटीसाठी दावा करु शकतात.

ग्रॅच्युइटी ही तीन गोष्टींवर अवलंबून असते. ग्रॅच्युइटी कायद्यानुसार, कर्मचाऱ्याने किमान ५ वर्ष पूर्ण केलेली असावी. जर एखाद्या कंपनीमध्ये ५ दिवस काम करण्याचा नियम असेल तर तो कर्मचारी ४ वर्ष १९० दिवस काम पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटीचा दावा करु शकतात. जर कंपनीत ६ दिवस काम करण्याचा नियम असेल तर त्या कर्मचाऱ्याला कंपनीत ४ वर्ष २४० दिवस काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळेल.

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, वकील आदित्य चोप्रा यांनी ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 4 (2) चे काही मुख्य मुद्दे स्पष्ट केले आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत ४ वर्ष ६ महिने काम केले असेल तर तो कर्मचारी ग्रॅच्युइटी पेमेंटचा हक्कदार असेल. याशिवाय काही विशेष परिस्थितीमध्ये म्हणजे कर्मचाऱ्याचा मृत्यू, आजार किंवा अपघातामुळे अंपगत्व या परिस्थिती किमान वेळ पूर्ण करण्याची अट लागू होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT