मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर प्रत्येकजण यशस्वी होतो. आयएएस गौरव अग्रवाल यांच्यासोबही असंच काहीसं घडलं. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांनी खूप कमी वयात देशातील सर्वात कठीण परीक्षा क्रॅक केल्या आहेत. ते सध्या आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. (Success Story)
गौरव अग्रवाल यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच जेईई परीक्षा क्रॅक केली होती. त्यांनी या परीक्षेतच ४५ वी रँक मिळवली होती. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी आयआयटी कानपुरमधून कॉमप्युटर सायन्समध्ये बीटेक केले.
गौरव अग्रवाल हे मूळचे जयपूरचे रहिवासी.ते लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी खूप कमी वयात चांगले यश मिळवले आहे. त्यांनी आयआयटी कानपुरमध्ये बीटेक केले. त्यात ते अनेक विषयांमध्ये फेल झाले.त्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली होती. (Success Story of IAS Gaurav Agarwal)
यानंतर २००५ मध्ये त्यांनी सर्वात कठीण परीक्षा कॅट क्रॅक केली. यानंतर त्यांनी आयआयएम लखनऊमध्ये अॅडमिशन घेतले.एमबीए केल्यानंतर त्यांना परदेशात नोकरी मिळाली होती.
गौरव हे हाँगकाँगमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करत होते. परंतु या कामात त्यांचे मन लागले नाही त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आणि ते आयपीएस अधिकारी बनले. परंतु ते समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा २०१३ मध्ये दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. यात ते यशस्वी झाले.
गौरव यांनी २०१३ साली यूपीएससी परीक्षेत टॉप केले होते. त्यांनी आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा सामना केला आहे. कॉलेजमध्ये असताना अपयश अनुभवलं आहे. परंतु कितीही काहीही झालं तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरु केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.