Aditi Tatkare Saam Tv
बिझनेस

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ५२ लाख महिलांना बाद केले असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या सर्व बातम्या निराधार असल्याचे मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती

५२ लाख महिला अपात्र नाहीत

आदिती तटकरेंनी दिली माहिती

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. महिलांना केवायसी करायला सांगितले आहेत. मात्र, केवायसी केल्यानंतर महिलांना अपात्र केले जाणार असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहेत. केवायसीआधीच ५२ लाख महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे, असा दावा केला जात आहे. मात्र, ही माहिती खोटी असल्याचे स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

केवायसीआधीच लाडक्या बहि‍णींची पडताळणी केली आहे. यातून ५२ लाख महिलांचे अर्ज बाद होत असल्याची माहिती प्रसार माध्यमांद्वारे सांगितली जात आहे. आता यावर स्वतः आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेतून ५२ लाख महिलांना अपात्र केली असल्याची बातमी निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय? (Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana)

काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. "प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र" अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी e-Kyc प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमांतून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर / शासन निर्णयाच्या माध्यमातून / अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. e-Kyc ची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी e-Kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती, अशा आशयाची पोस्ट आदिती तटकरेंनी शेअर केली आहे.

केवायसीसाठी मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करु शकतात.आता फक्त १ महिना बाकी आहे. त्यामुळे या काळात सर्व लाडक्या बहि‍णींनी केवायसी करण्याचे आवाहन आदिती तटकरेंनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT