team india 1 
बातम्या

WTC Final: सामना जर अनिर्णित राहिला तर काय? ICC नं दिलं उत्तर

अक्षय कस्पटे

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पुढील महिन्यात पहिला जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याबद्दल बरीच चर्चा झाली होती आणि असेही म्हटले जात होते की विजयी संघ निश्चित करण्यासाठी किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका असावी.  असेही म्हटले जात होते की जर हा विश्व अजिंक्यपद अंतिम सामना अनिर्णित राहिला तर नक्की विजय कोणाचा होणार. (What if the WTC final is a draw? The ICC has responded)

कारण कसोटी क्रिकेटमध्ये बहुतेक सामने ड्रॉ होण्याची शक्यता असते. मात्र, जर हा अंतिम सामना अनिर्णीत राहिला तर काय होईल हे आयसीसीने स्पष्ट केले आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून साऊथहॅम्पटन (South Hampton) हॅम्पशायर बाउल  येथे होणार आहे.

हे देखील पाहा

जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर काय होईल असा प्रश्न चाहते विचारात होते.  परंतु, जून 2018 मध्ये निर्णय घेण्यात आला की जर विश्व अजिंक्यपद सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना विजयी घोषित केले जाईल. आयसीसीने आज पुढील महिन्यात खेळल्या जाणार्‍या अंतिम सामन्याचे नियम व अटी जाहीर केल्या आहेत.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, जर अजिंक्यपद सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाना विजयी घोषित केले जाईल. त्याचबरोबर, नियमित पाच दिवसाच्या खेळादरम्यान जर वेळ गेला असेल तर त्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. हे दोन निर्णय जून 2018 मध्येच घेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT