सोलापूर - पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा काळ लोटला तरीही कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित भागात वरुणराजाने दडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात २० ते २५ जुलै दरम्यान कृत्रिम पावसाचा या वर्षीचा पहिला प्रयोग करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. त्यामुळे सोलापूर, औरंगाबाद व मुंबई या रडार केंद्राच्या २०० किलोमीटर परिसराला याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्यात सरासरीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी राहील असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला असतानाही सुरवातीच्या काळात राज्य सरकारने कृत्रिम पावसासाठी हालचाली केल्या नाहीत. तत्पूर्वी, अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी आणि कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी लागणाऱ्या परवानग्याही वेळेवर मिळाल्या नसल्याने विलंब लागल्याची माहिती मदत व पुनवर्सन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मागील दीड महिन्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, औरंगाबाद यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडल्याने बळिराजाचा चिंता वाढल्याचे चित्र आहे, त्यामुळे २० जुलै ते सप्टेंबरअखेर यादरम्यान कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित जिल्ह्यात विमाने मुक्कामी पाठवण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.