बातम्या

भारताने #Article370 हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरलं; पाकिस्तानचा काश्मीरसंबंधी मोठा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच पाकिस्तान घाबरले असल्याचे लक्षात येत आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दावा केला आहे की, पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत परत घेईल. 

बसित म्हणाले की, भारतात काम करतेवेळी भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी म्हटले होते की, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए हटविण्यात येईल. तसेच, पाकव्याप्त काश्मीरसुद्धा भारत परत घेईल. आता पाकिस्तानने काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35ए हटविले आहे. आता बसित यांना भीती आहे की, भारत पाकव्याप्त काश्मीरसुद्धा परत घेईल.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानमधून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानाच्या एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात अब्दुल बासित यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांची भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांच्याशी चर्चा झाली होती असे त्यांनी सांगितेल आहे. त्यावेळी काश्मीरसंबंधी भारताने मोठा निर्णय घेण्याबाबत तयारी केली होती असे राम माधव यांनी म्हटले होते.'

WebTitle : marathi news after india revoked article 370 pakistan is under tension see waht pakistan has to say

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi School News : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

Rahul Gandhi News | महायुतीच्या प्रचार सभेत राहुल गांधींचा जयघोष

Heat Wave Alert: देशात उष्णतेचा स्फोट! या राज्यात 8 दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

Menstrual Care: मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात का? 'हे' उपाय केल्यास पोटदुखी कमी होईल

Lok Sabha Election: काँग्रेसविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, केसीआर यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

SCROLL FOR NEXT