बातम्या

असदुद्दीन ओवेसी यांनी  उडविली  शिवसेनेची खिल्ली

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेकडून महाराष्ट्रात सुरु असलेले हे 50-50 काय आहे? नवं बिस्कीट आहे का? असे म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे.

भाजप आणि शिवसेना या युतीतील मित्रपक्षांमध्ये अद्याप महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून एकमत झालेले नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत. तर, शिवसेना जे ठरले आहे त्याप्रमाणे वाटाघाटी व्हाव्यात अशी मागणी करत आहे. भाजपकडून अद्याप कोणताही चर्चेसाठी प्रस्ताव आलेला नाही. या सर्व घडामोडींवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे.

ओवेसी म्हणाले, की अरे हा 50-50 फॉर्म्युला नेमका काय आहे. हे काय नवीन बिस्कीट आहे. तुमचा फॉर्म्युला महाराष्ट्रातील जनतेला वाचवू शकणार आहे का? तुमचा हा फॉर्म्युला सबका साथ, सबका विकास आहे का? उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे असेल, तर ते दोन घोड्यावर बसू शकत नाहीत. एकिकडे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ते आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपा संगीत खूर्ची खेळत आहेत. एमआयएम ना भाजपचे ना शिवसेनेचे समर्थन करणार. उद्धव ठाकरे मोदींना घाबरतात. दोन पाऊल पुढे जातात आणि तीन पाऊल मागे येतात. जर घाबरत नसाल, तर केंद्रातील आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा.

Web Title: Asaduddin Owaisi takes jibe on bjp shivsena says on what is this 50-50 formula
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये Dining Table कुठे असावा? जाणून घ्या

Benifits of Jaljeera: रोज एक ग्लास जलजीरा पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Weightloss Recipe: डायटींग करताना सोपी आणि हेल्दी चाट रेसिपी करा ट्राय

Today's Marathi News Live : ​हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर

CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय; संजय निरुपम यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT