Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha News : कृषी केंद्र संचालकांकडून बियाणांचा कृत्रिम तुटवडा; तात्काळ कारवाई करण्याची मागणी

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: पावसाचे आगमन झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी कृषी केंद्रावरून बियाणे खरेदीसाठी गर्दी करत आहे. अश्यातच जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक बियाण्यांचा कुत्रीम तुटवडा निर्माण करत काळाबाजार केला जात आहे. बियांना होत असलेला काळाबाजार थांबवून कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

खरीप हंगाम सुरु झाला असून पाऊस देखील बऱ्यापैकी पडला आहे. पाऊस पडल्यामुळे शेतात पेरणी करण्यासाठी शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत. मात्र बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून काळाबाजार करण्यास सुरवात झाली आहे. दुकानात बियाणे असून देखील त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांकडून (Farmer) अधिक रक्कम घेत आहे. बियाणे विक्रीकारिता अनेक एजेंटच्या माध्यमातून काळाबाजार केल जातं आहे. सोबतच बियाणे घेताना शेतकऱ्यांकडून लिंकिंगची जबरदस्ती केली जातं आहे.

मनसेची कृषी कार्यलयावर धडक 

या सर्व मुद्याना घेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृषी अधिकारी कार्यालयावर (Agriculture Department) धडक दिली. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्र संचालकांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT