Manasvi Choudhary
पावसाळा सुरू झाला की बाजारात काही रानभाज्या विकायला येतात. रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात.
कंटोळी या भाजीचे सेवन तुम्ही पावसाळ्यात केले पाहिजे. कंटोळीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात.
जर तुम्हाला रोजच्या भाजीचा कंटाळा आला असेल, तर पावसाळ्यात जेवणासोबत तोंडाची चव वाढवण्यासाठी कंटोळीच्या काचऱ्या ही रेसिपी ट्राय करा.
कंटोळी भाजी बनवण्यासाठी कंटोळी, कांदा,मोहरी, जिरे, हिंग, मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
कंटोळीच्या काचऱ्या बनवण्यासाठी सर्वातआधी सर्वात आधी कंटोळी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कंटोळीच्या गोलाकर चकत्या करा. यामध्ये थोडे मीठ मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जीरे, मोहरी, हिंग याची फोडणी द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या
नंतर या मिश्रणात मसाला, हळद आणि मीठ टाका. संपूर्ण मिश्रण एकजीव करा. नंतर त्यात कंटोळी घालून परतून घ्या
संपूर्ण मिश्रण वाफेवर शिजवून घ्या नंतर मिश्रण शिजले की त्यात कोथिंबीर मिक्स करा.