सांगली : भावाभावांमध्ये जमिनीचे वाद नेहमीच ऐकण्यास मिळतात. अशाच प्रकारे सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील तोंडली येथे शेत जमिनीच्या वादातुन शेतातील पिकांवर तणनाशक फवारणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे कृत्य सख्ख्या भावानेच केले असून याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील तोंडोली गावातील सुरेश आणि नवनाथ याच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेत जमिनीच्या कारणावरूनवाद सुरू आहेत. यातून दोघा भावांमध्ये नेहमीच भांडण होत असे. दरम्यान या वादातून सुरेश यांनी शेतात लागवड केलेल्या बटाटा पिकावर भाऊ नवनाथ यांनी तणनाशक फवारणी केली आहे. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
लाखोंचे नुकसान
सुरेश यांनी आपल्या शेतात ४० गुंठे क्षेत्रात बटाटा पीक लावले आहे. या पिकावर स्वतःच्या भावानेच शेतामध्ये तणनाशक फवारणी करून पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरेश यांनी आपल्या भावाविरोधात कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या घटनेची कडेगाव पोलिसांमध्ये नोंद झाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.