Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : दोन दिवसापासून ढगाळ वातावरण; रब्बी पिकांना धोका, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत

Sangli Jalna News : हवामान खात्याने पावसाचा अंदाज यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी आणि फळबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे/ विजय पाटील 
जालना/सांगली
: मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहण्यास मिळत आहे. याशिवाय पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून हरभरा व द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून आज आणि उद्या जालना जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी आणि फळबागांवर देखील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान रब्बी हंगामातील हरभरा हे पीक सध्या फुल अवस्थेमध्ये असून या ढगाळ वातावरणामध्ये फुलगळ होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. 

सांगलीत धुक्याचा प्रादुर्भाव 

सांगली : गेल्या दोन दिवसांपासून पडलेले धुके आणि सतत बदलणारे हवामानामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सतत हवामान बदलामुळे तसेच गेल्या दोन- तीन दिवसापासून पडणारे धुके यामुळे भाजीपाला शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी भाजीपाला पीक वाचवण्यासाठी आपल्या भाजीपाल्यावर औषध फवारणी करू लागला आहे. वाळवा तालुक्यात शेतकरी हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने ड्रोनद्वारे पिकावर औषध फवारणी करू लागला आहे. 

रब्बी हंगमातील पिकांना धोका
वाशिम जिल्ह्यात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर संकट कोसळले आहे. हरभरा पिके ऐन फुलांच्या अवस्थेत असताना वातावरणातील बदलांमुळे पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी फवारणीद्वारे या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सततचे ढगाळ वातावरण आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे अळीचा प्रभाव रोखणे कठीण जात आहे. या परिस्थितीत शेतकरी चिंतेत आहेत. कारण प्रादुर्भावामुळे पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT