red chillies, nandurbar saam tv
ऍग्रो वन

Loss Of Chilli : अवकाळीचा झटका... नंदूरबारच्या मिरची व्यापाऱ्यांना 50 लाखांचा फटका; सरकारच्या निर्णयाकडं लक्ष

सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा शेतक-यांसह व्यापा-यांची आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सागर निकवाडे

Nandurbar : नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते. इतर राज्यात मिरची निर्यात केली जाते परंतु अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मिरची पिकाला देखील बसला आहे. (Maharashtra News)

व्यापा-यांनी शेतकऱ्यांकडून मिरची विकत घेऊन सुकवण्यासाठी पथारीवर टाकली होती. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे (rain) व्यापारी वर्गाची एकच तारांबळ उडाली. पथारीवर सुकवण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची पावसामुळे खराब झाली.

शेतकऱ्यांसोबतच (farmers) आता व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान व्यापाऱ्यांचे झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून व्यापाऱ्यांना देखील मदत करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. आता सरकार नेमका काेणता निर्णय घेणार याकडे मिरची उत्पादक शेतकरी आणि व्यापा-यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: क्राइम ब्रँच पथकाने केली भोंदू अशोक खरातच्या ऑफिसची झाडाझडती

Tax Free Income: सरकारच्या तीन योजना आहेत बेस्ट; गुंतवणुकीच्या १ रुपयावरही लागत नाही टॅक्स; जाणून घ्या संपूर्ण तपशील

Pune News: दैव बलवत्तर! लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर पडली विजेची तार अन्...

Dhule News : ४४० किलो गांजा, किंमत दीड कोटी; ड्रग्ज माफियांचा पोलिसांनी केला पर्दाफाश, २४ वर्षांच्या तरुणाला बेड्या

Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते, VIP जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड

SCROLL FOR NEXT