raju shetti Saam Tv
ऍग्रो वन

द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना पॅकेज द्या : राजू शेट्टी

एकरी चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

विजय पाटील

सांगली : नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा (insurance) योजना सक्षम करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी दिला आहे. ते सांगलीच्या मिरज तालुक्यातील लींगणूर येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्यासाठी आले हाेते. त्यावेळी शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आदी तालुक्यातील ६० ते ७० हजार एकर वरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. घडकुज, दावन्या आदीसह अन्य कारणांनी संपूर्ण द्राक्ष बगाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. यामुळे एकरी चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा साडेचार हजार कोटीचा आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे ,धीर देणे आणि पाहणी करण्यासाठी शेट्टी रविवारी मिरज पूर्व भागात आले होते. त्यावेळी शेट्टी यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी. अन्यथा रस्त्यावर उतरू असे नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणवासियांच्या प्रवासात खड्ड्यांचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गांवर वाहतूक कोंडी

गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट, 492 संस्थांच्या पात्रतेला सुप्रीम कोर्टात आव्हान

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरू

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT