भात लागवड उशिरा होत असल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यता दिनू गावित
ऍग्रो वन

भात लागवड उशिरा होत असल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यता

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : प्रत्येक वर्षी भात पिकाची लागवड जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी बांधवांकडून सुरु केली जाते. परंतु यंदा नंदुरबार जिल्ह्यात कमी पर्जन्यमान व उशिरा आलेल्या पावसामुळे भात लागवड उशिराने होत आहे. तर काही भागात पावसाअभावी भाताची लागवड खोळंबली आहे.

हे देखील पहा -

रोपण भात लागवड करण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असते. लागवडीपूर्वी शेतात चिखल करून त्यात भात लागवड केली जाते. या पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होते. भाताची लागवड केल्यानंतर त्याला कायमस्वरूपी पाण्याची गरज असते. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व बोरवेल द्वारे पाण्याची सोय उपलब्ध आहे, त्यांनी भाताची लागवड सुरू केली आहे.

एकंदरीत कमी पावसामुळे जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, मका, या नगदी पिकांसह इतर पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आणखी पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने यंदा भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT