अकोला: शेतीचा कामे चालू झाली आहेत. मात्र कमी-अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले आहेत. खते घेऊन जात असताना एका शेतकऱ्याची बैलगाडी चिखलमय रस्त्यात फसली आहे. त्यामुळे शेतात जावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. (Panand road became muddy, a bullock cart got stuck in the mud)
हे देखील पहा -
शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे, आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, दीर्घ कालावधीनंतरही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने चिखलमय रस्त्यावरून शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले. अकोल्यातील निजामपूर ते टाकळी बू. परिसरातील शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात जावे लागत आहे.
निजामपूर येथे शेतात बैल गाडीत खते घेऊन जाताना चिखलात बैल गाडी फसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली. पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाण्याची वेळ आली आहे. पाणंद रस्ते चिखलमुक्त करण्यासाठी शासनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरवावा, पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद नसल्याने निजामपूर येथील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.