Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : पाण्याअभावी पेरणी केलेले रोप करपून जाण्याची भीती; वादळी वाऱ्याने वीज पुरवठा खंडित

Nandurbar news : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत खांब रोहित्रीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : काही भागात मान्सूनपूर्व पेरणीला सुरवात झाली आहे. बागायतदार शेतकरी पिकांना पाणी देऊन पीक जगवत आहेत. मात्र वादळी वाऱ्यामुळे अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात विद्युत पोल वादळे आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतात लागवड केलेल्या पिकांना पाणी देता येत नाही, कडक उन्हामुळे हे पीक आता करपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत खांब रोहित्रीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यातील १३२ केव्ही उपकेंद्राचे रोहित्र जळाल्याने ग्रामीण भागातील वीज खंडित झाली आहे. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे विजेच्या तारा व रोहित्र जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळामुळे विजेच्या तारा तुटल्या, तसेच विद्युत पोल आडवे पडले आहेत.

तळोदा व अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित झाल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. तालुक्यात केळी, मिरची, ऊस व पपई पिकांची लागवड करण्यात आली आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने लावलेली रोपे करपू जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  महावितरण विभागाकडून दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT