Nandurbar Heavy Rain  Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Heavy Rain : सलग दोन दिवस अतिवृष्टी; हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने आणि दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग तीन ते चार दिवस पिके पाण्याखाली असल्याने पिके खराब होण्यास सुरुवात झाली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असून प्रशासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे मातीमोल झाला आहे. जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी, पपई, मिरची, कापूस, सोयाबीन, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती शिवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतात साचलेले हे पाणी लवकर कमी होणार नसल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) यात प्रचंड नुकसान झाले आहे. 

आता घोषणा नको, मदत द्या 

प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात यावे. सरकार देते ती मदत कमी आहे. पंचनामे करून शेतकऱ्याने केलेल्या उत्पादन खर्च इतकी मदत करावी. सरकार फक्त घोषणा करतो, पंचनामे करते मात्र मदत करताना आखडता हात घेत असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT