Nandurbar Heavy Rain  Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Heavy Rain : सलग दोन दिवस अतिवृष्टी; हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे मातीमोल झाला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने आणि दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग तीन ते चार दिवस पिके पाण्याखाली असल्याने पिके खराब होण्यास सुरुवात झाली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असून प्रशासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे मातीमोल झाला आहे. जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी, पपई, मिरची, कापूस, सोयाबीन, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती शिवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतात साचलेले हे पाणी लवकर कमी होणार नसल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) यात प्रचंड नुकसान झाले आहे. 

आता घोषणा नको, मदत द्या 

प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात यावे. सरकार देते ती मदत कमी आहे. पंचनामे करून शेतकऱ्याने केलेल्या उत्पादन खर्च इतकी मदत करावी. सरकार फक्त घोषणा करतो, पंचनामे करते मात्र मदत करताना आखडता हात घेत असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT