Nandurbar Heavy Rain  Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Heavy Rain : सलग दोन दिवस अतिवृष्टी; हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे मातीमोल झाला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने आणि दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग तीन ते चार दिवस पिके पाण्याखाली असल्याने पिके खराब होण्यास सुरुवात झाली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असून प्रशासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे मातीमोल झाला आहे. जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी, पपई, मिरची, कापूस, सोयाबीन, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती शिवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतात साचलेले हे पाणी लवकर कमी होणार नसल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) यात प्रचंड नुकसान झाले आहे. 

आता घोषणा नको, मदत द्या 

प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात यावे. सरकार देते ती मदत कमी आहे. पंचनामे करून शेतकऱ्याने केलेल्या उत्पादन खर्च इतकी मदत करावी. सरकार फक्त घोषणा करतो, पंचनामे करते मात्र मदत करताना आखडता हात घेत असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT