Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : पाणी नसल्यामुळे पिके वाया जाण्याच्या स्थितीत; शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकरी आक्रमक

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सध्या दुष्काळाची परिस्थितीत शेतात असलेल्या पिकांना जगवाव कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा गावात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

शेतकऱ्यांनी (Nandurbar) शेतामध्ये ऊस, कापूस, पपई या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पिकांना पाणी मिळत नसल्याने पीक वाया जाण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer) पुन्हा कर्जबाजारी होईल की काय अशी शंका होत आहे. पिके वाया गेली तर पुन्हा नवीन पेरणी करावी लागणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा 

तीव्र उन्हात पीक उभे असून ऊस, कापूस, पपई या पिकांना पाण्याची अत्यावश्यक गरज आहे. शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी मिळत नाही. म्हणून पिके वाया जाण्याचा मार्गावर आहेत. म्हणून येत्या दोन दिवसात कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रकाशा गावातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT