Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : पाणी नसल्यामुळे पिके वाया जाण्याच्या स्थितीत; शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकरी आक्रमक

Nandurbar news : शेतकऱ्यांनी शेतामध्ये ऊस, कापूस, पपई या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पिकांना पाणी मिळत नसल्याने पीक वाया जाण्याचा मार्गावर आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सध्या दुष्काळाची परिस्थितीत शेतात असलेल्या पिकांना जगवाव कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा गावात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

शेतकऱ्यांनी (Nandurbar) शेतामध्ये ऊस, कापूस, पपई या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पिकांना पाणी मिळत नसल्याने पीक वाया जाण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer) पुन्हा कर्जबाजारी होईल की काय अशी शंका होत आहे. पिके वाया गेली तर पुन्हा नवीन पेरणी करावी लागणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा 

तीव्र उन्हात पीक उभे असून ऊस, कापूस, पपई या पिकांना पाण्याची अत्यावश्यक गरज आहे. शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी मिळत नाही. म्हणून पिके वाया जाण्याचा मार्गावर आहेत. म्हणून येत्या दोन दिवसात कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रकाशा गावातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पोलीस ठाण्यात राडा! दारूच्या नशेत चालकाचा गोंधळ, पोलिसांना शिवीगाळ अन् मारहाण; फोन, लॅपटॉपही फोडले

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; राज्य कबड्डी असोसिएशन प्रशासक नियुक्तीला स्थगिती

Maharashtra Live News Update: अस्तंबा यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर

एकेकाळी ५ हजार रूपये कमावणारी अभिनेत्री आता आहे करोडोंची मालकीण

OBC Reservation : ओबीसी समाजाला मोठा धक्का! सरकारच्या ४२ टक्के आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT