Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात १५०० हेक्टरवरील पिकांना फटका; मिरची, केळी, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे साधारण १५५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय वित्त हानी देखील झाली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाचा अवकृपेमुळे वाया गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.  

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे साधारण १५५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय वित्त हानी देखील झाली आहे. यात १५ घरांची पडझड झाली असून नंदुरबार तालुक्यातील एका पांझर तलावाला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे (Rain) शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने पिके खराब होण्यास सुरवात झाली आहे.  

सोमवारपासून पंचनामे 

पावसामुळे जिल्ह्यात सर्वाधिक फटका मिरची, केळी, सोयाबीन यासह कडधान्य आणि भात पिकला बसला आहे. चार दिवसापासून पाऊस सुरु असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास अडचणी येत होत्या. मात्र सोमवारपासुन प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरवात होणार आहे. जिल्ह्यात या वर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने लहान मोठे सर्व प्रकल्प भरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT