Nandurbar Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : ५० टक्के पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विम्याची भरपाई

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी स्थिती असून राज्य सरकारने जिल्ह्यातील ३७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या मंडळांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात यंदा उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरपाई दिली जात आहे. यात आतापर्यंत (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच लाभ देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी सांगितले. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी स्थिती असून राज्य सरकारने जिल्ह्यातील ३७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या मंडळांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा (Crop Insurance) लाभ मिळणार आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) आणि पाणीपुरवठा योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्य सरकार संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा शब्द यावेळेस पाटील यांनी दिला.

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आतापर्यंत जिल्ह्यातील ५० टक्के पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांना अजूनही विम्याचा लाभ मिळालेला नाही. परंतु दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना येत्या काळात दुष्काळी परिस्थितीमध्ये राहिलेला पिक विमाही लवकरच मिळणार आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने योग्य ती पावलं उचलली जात असून दुष्काळी परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT