Navapur Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Navapur Heavy Rain : नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान; अजूनही शेतात साचलंय पाणी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांना फटका बसला आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : पाच दिवसांपूर्वी नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे तालुक्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतीत पाणी शिरल्याने उभे पिक आडवे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान पावसामुळे झाले आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांना फटका बसला आहे. तर गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे देखील नवापूर (Navapur) तालुक्यातील शेती पिकांना फटका बसत आहे. आजही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिक जगावले होते. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

पंचनामे करण्याची मागणी 

अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तालुक्यातील अनेक भागात नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतातील पीक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात विमानतळ गुडूप, धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

SCROLL FOR NEXT