Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात होणार घट, शेतकरी चिंतेत

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जवळपास ४ लाख १२ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र यातील ३० टक्के क्षेत्रावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : यंदा सुरवातीपासून सततच्या पावसामुळे पिकांवर रोगराई अधिक प्रमाणात पसरली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर आळीचा प्रादुर्भाव वाढला असून यासोबतच मोठ्या प्रमाणात रोग पड्लेला पाहण्यास मिळत आहे. दरम्यान आता सोयाबीनवर यलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

नांदेड (Nanded) जिल्ह्यात जवळपास ४ लाख १२ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र यातील ३० टक्के क्षेत्रावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळत आहे. अगोदरच (Soyabean Crop ) सोयाबीनवर उंट आळीचा प्रादुर्भाव असताना येलो मोझॅक रोगाने अटॅक केला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. 

उत्पनात घट होण्याची शक्यता 

सोयाबीन पिकावर पडलेल्या या कीडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आता सोयाबीन पिकावरील रोगामुळे  आता लागवड खर्च ही निघणार नसल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT