Nanded News Saam tv
ऍग्रो वन

Nanded News: नुकसानीच्‍या पंचनाम्‍यांना विलंब; शेतकरी आर्थिक संकटात

नुकसानीच्‍या पंचनाम्‍यांना विलंब; शेतकरी आर्थिक संकटात

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्‍ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासुन आवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. पाऊस, गारा आणि वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तरी देखील (Nanded News) अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. यामुळे (Farmer) शेतकरी संकटात सापडला आहे. (Live Marathi News)

नांदेड जिल्‍ह्यात गेल्या २५ एप्रिलला जिल्ह्यात तुफान पाऊस (Rain) आणि गारपिट झाली होती. मात्र नुकसान होउन दहा दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाही. नांदेड जिल्‍ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. केळी, पपई, आंबा, ज्वारी, हळद यासह भाजीपाल्याचे नुकसान झाले. या भागात मात्र अजुनही पंचनामे सूरु झाले नाही.

साडेबारा हजार हेक्‍टरवर नुकसान

पंचनाम्याना विलंब होत असल्याने नुकसानीची तिव्रता दिसणार नाही. नंतर कमी नुकसान दाखवून कमी मोबदला दिला जाईल; अशी शेतकऱ्यांना भीती आहे. दरम्यान २५ एप्रिलला झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात साडेबारा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्‍याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सद्या ५० टक्के पंचनामे पूर्ण झाले. येत्या काही दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल पाठवनार असल्याचे जिल्हाधिकरी अभिजित राउत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

SCROLL FOR NEXT