Shreya Maskar
पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर शहरापासून वायव्येस सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्हाळा या हिल स्टेशन येथे वसलेला आहे.
पन्हाळा किल्ला मूळतः शिलाहार वंशाचा राजा भोज (दुसरा) याने इ.स. ११८० ते १२०९ या काळात बांधला होता. नंतरच्या काळात बहामनी आणि आदिलशाही सल्तनतींच्या तसेच मराठा साम्राज्याच्या राजवटीत या किल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आणि बळकटीकरण करण्यात आले.
पन्हाळा किल्ला ही १२ व्या शतकात बांधलेली एक भव्य वास्तू आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक सुटकेसाठी प्रसिद्ध आहेच.
किल्ल्याच्या आत 'अंबरखाना' संकुलात गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन स्वतंत्र , भव्य धान्य साठवणुकीची कोठारे आहेत. यातील सर्वात मोठ्या असलेल्या 'गंगा' कोठारात, दीर्घकाळ चालणाऱ्या वेढ्यादरम्यान सैन्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी तब्बल २५,००० खंडी धान्य साठवले जाऊ शकत असे.
अंधार बावडी ही अनेक स्तर असलेली आणि तीन मजली अशी एक गुप्त भूमिगत विहीर आहे. तिची रचना अत्यंत कल्पकतेने करण्यात आली होती; यात अनेक दिशाभूल करणारे मार्ग आणि गुंतागुंतीचे कॉरिडॉर्स होते, जेणेकरून आत घुसलेले शत्रू भरकटले जावेत किंवा सापळ्यात अडकावेत.
वाघ दरवाजा याला 'टायगर गेट' असेही म्हणतात. हा अत्यंत अरुंद आणि कडक पहारा असलेला गुप्त बाहेर पडण्याचा मार्ग थेट कड्याच्या बाजूला कोरलेला आहे. त्याची रचना शत्रूंना तो दुरून दिसत नसे.
पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी ५०० हून अधिक दिवस वास्तव्य केले होते. स्वराज्याच्या अनेक महत्त्वपूर्ण लष्करी आणि राजनैतिक योजना याचगडावरून आखल्या गेल्या होत्या.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.